शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गूळ नियमन अखेर कायम; चंद्रकांतदादा

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

शेतकऱ्यांना दिलासा; बाजार समित्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

कोल्हापूर : गुळावरील रद्द केलेले नियमन कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने आज, मंगळवारी घेतला. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, बाजार समित्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पूर्ववत गूळ खरेदी व विक्रीवर बाजार समितीचा अंकुश राहणार आहे.शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेला माल विकण्याची मुभा असावी, यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारने ३ मार्च २०१४ पासून गूळ, बेदाणा, रवा-मैद्यासह ड्रायफ्रूटवरील बाजार समित्यांचे नियमन काढून टाकले होेते. या निर्णयामुळे अडत्यांचा हस्तक्षेपच बंद झाला होता.गूळ व बेदाणे वगळता इतर वस्तूंवर या निर्णयाचा फारसा परिणाम झाला नव्हता; पण कोल्हापूरमध्ये बहुतांश गूळ उत्पादक हे लहान शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना अडत्यांच्या माध्यमातूनच गुळाची विक्री करावी लागते. गुऱ्हाळघराच्या खर्चासाठी त्याला अडत्याकडूनच आगाऊ पैसे घ्यावे लागतात. शेतकरी-अडते-व्यापारी-बाजार समिती ही साखळी अचानक तुटल्याने गेले सहा महिने शेतकरी गोंधळून गेला होता. सांगली जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचीही नियमन कायम ठेवण्याची मागणी होती. गूळ खरेदी-विक्रीवर समितीचा अंकुश राहिला नसल्याने मध्यंतरी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे न देताच पोबारा केला होता. त्यामुळे गुळावरील नियमन कायम राहावे, यासाठी शेतकऱ्यांचा गेले सहा महिने रेटा होता. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर आज पणनमंत्री पाटील यांनी गुळावरील नियमन कायम ठेवण्याचे आदेश दिले. गुऱ्हाळघर बंदला थंडा प्रतिसादगूळदराच्या झालेल्या घसरणीविरोधात सुरू केलेल्या ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनाला शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे. आज, मंगळवारी शाहूवाडी, पन्हाळा व करवीरमधील काही गुऱ्हाळघरे सुरू होती. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत बाजार समितीत गुळाची आवक राहिली. रविवारी झालेल्या गुऱ्हाळमालकांच्या बैठकीत काल, सोमवारपासून गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण या निर्णयाने गुऱ्हाळधारकांमध्येच उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज तब्बल ५९ हजार ७०० रव्यांची विक्री झाली. आजचे सौदे संपले तरी दुपारनंतर गुळाची आवक बाजार समितीत सुरूच होती. रात्री उशिराही समितीत गूळ येत होता. साधारणत: सायंकाळपर्यंत समितीत २० हजार गूळ रव्यांची आवक झाल्याचे समजते. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गूळ नियमन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारचा मोर्चा रद्द करून ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनही मागे घ्यावे, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी केले.