शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’मध्ये टनास १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:06 IST

विश्वास पाटील। कोल्हापूर : आगामी हंगामात उसाच्या वाजवी व किफायतशीर किमतीत (एफआरपी) टनास बेसिक १० उताऱ्यास १०० रुपयांची वाढ ...

ठळक मुद्देकृषिमूल्य आयोग : आंदोलनाशिवाय टनास तीन हजार पक्के

विश्वास पाटील।कोल्हापूर : आगामी हंगामात उसाच्या वाजवी व किफायतशीर किमतीत (एफआरपी) टनास बेसिक १० उताऱ्यास १०० रुपयांची वाढ करण्याची शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केली आहे. त्यामुळे साडेबारा उताºयास टनास तोडणी-ओढणी वजा करून शेतकऱ्यांस न आंदोलन करताच तीन हजार रुपये कायद्यानेच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.केंद्र शासनाने सोमवारीच (दि. १) चौदा खरीप पिकांच्या हमीभावात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमूल्य आयोगाची ही शिफारस केंद्र सरकारकडून स्वीकारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० उताºयास किमान २८५० रुपये (तोडणी-ओढणी खर्चासह) मिळू शकतात. ‘एफआरपी’मध्ये वाढ केली तर केंद्राने साखरेचा खरेदी दरही किमान क्विंंटलला ३५०० रुपये करण्याची गरज आहे अन्यथा कारखानदारीच्या अडचणी वाढतील.

मागच्या हंगामातील एफआरपी दहा उताºयास २७५० रुपये होती. ती १०० रुपये वाढल्याने २८५० रुपये होईल. त्याशिवाय त्यावरील उताºयास गतवर्षी २७५ रुपये दिले जात होते. आता २८५ दिले जाऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी उतारा १२.५० पर्यंत असतो. त्यामुळे त्याचा हिशेब केल्यास टनास ३५६३ रुपये एफआरपी मिळू शकते. त्यातून तोडणी-ओढणी खर्चाचे ६०० रुपये वजा केल्यास शेतकºयाला एफआरपीच २९६३ रुपये मिळू शकते. साखरेचा खरेदीदर ३१०० रुपये विचारात घेतल्यास कारखान्याला एका टनापासून एकत्रित उत्पन्न म्हणून ४३०० रुपये मिळतात. त्यातून एफआरपीचे ३५६३ रुपये वजा केल्यास ७३७ रुपयेच शिल्लक राहतात. साखरेचा किमान उत्पादन खर्च किमान १२५० रुपये आहे. त्यामुळे नुसती एफआरपी वाढवली व साखर खरेदीचा दर वाढवला नाही तर मात्र कारखान्यांसमोरील अडचणी वाढतील, अशी भीती उद्योगातून व्यक्त होत आहे व त्यात नक्कीच तथ्य आहे.

एफआरपीचा आधार काय...साखर उत्पादनाचा प्रत्यक्ष खर्चसाखरेची मागणी व पुरवठा यांतील मेळदेशांतर्गत व देशाबाहेरील साखरेचे दरआंतरपिकांपासून मिळणारे उत्पन्नसाखरेच्या उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्नउसाचा उत्पादन खर्चऊस उत्पादकास वाजवी परतावा

 

केंद्र शासन एका बाजूने प्रत्येक वर्षी एफआरपीची किंमत वाढवत आहे. शेतकरी हिताचा विचार करता हे चांगलेच आहे; परंतु कारखानदारी टिकायची असेल तर केंद्राने साखरेचा किमान खरेदी दरही क्विंटलला ३१०० ऐवजी ३५०० रुपये करण्याची गरज आहे, अन्यथा कारखानदारीची दुखणी वाढतील.- विजय औताडे, साखर उद्योग तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा