शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 9:01 AM

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय.

कोल्हापूर - शिवसेना नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील आलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग त्या पद्धतीने सुरू नसल्याने खऱ्या अर्थानं मृत्युच्या कळा आमच्या लोकांना येत आहेत. 2005 च्या तुलनेत या नैसर्गिक आपत्तीचा विचार केल्यास, बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रसासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, असे म्हणत माने यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.  

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. बोटीमध्ये बसताना लोकं घाबरतायेत, एकट्या कोल्हापुरात 20 बोटी काम करत होत्या. मात्र, शिरोळ तालुक्यात जिथं हजारो लोकं अडकलेत तिथं केवळ 20 बोटी. हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा आहे. मी स्वत:पासून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. पण, प्रशासनाचे खऱ्या अर्थाने कान उघडण्याचे, कान उपटण्याची गरज आहे, अशा शब्दात धैर्यशील माने यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

आमचा एखाद जरी माणूस दगावला तरी, त्याला 100 टक्के आम्हीच कारणीभूत आहोत, असे म्हणत माने यांनी सरकारी यंत्रणाही फोल ठरत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या माणसं जगवणं, त्यांचा जीव वाचवणं हीच प्राथमिकता आहे. त्यानंतर, काय अनुदान द्यायचं, कसं सावरायचं हे पाहता येईल. इचलकरंजी, शिरोळ तालुक्यात अद्यापही पाण्याची पातळी वाढतेय. घरातील लोकं मदतीच्या बोटीची वाट पाहत बसले आहेत. अन्नधान्य संपलंय, केवळ धैर्यशील माने एकटा काहीही करू शकत नाही. प्रशासनाने गंभीर भूमिका घेणं गरजेच असून कलेक्टर ऑफिस शिरोळ तालुक्यात आणलं पाहिजे, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले. 

आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग हवा तेवढा नसल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल, विसर्ग आपला 435 आणि आलमट्टीचा विसर्ग 460 एवढं आहे. म्हणजे केवळ 25 चा डिफरन्स ? 25 च्या या डिफरन्समध्ये आमची गावं बुडून जातील ना. दोन राज्यांचा हा लवाद आहे, दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून किती विसर्ग करायचा हे ठरवावं. त्यांची बुडतील म्हणून जर आमची बुडवत असतील तर पुढं, इथं माझ्या मतदारसंघातून नक्षलवादी जर आलमट्टीच्या धरणामध्ये तयार झाले तर, त्याला शासन जबाबदार आहे, असं माझं प्रामाणिक मत असल्याचा तीव्र संताप धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, कोल्हापूर येथील पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली असली तरी, अद्यापही सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. नागरिकांना मदतीचा हात हवाय, राज्यभरातून मदत मिळतेय, तरीही आणखी मदतीची गरज आहे.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदारKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊस