शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’चा उच्चांकी २६४० दर

By admin | Updated: December 21, 2014 00:39 IST

राज्यात विक्रम : चंद्रदीप नरके यांची घोषणा ; एकरकमी देणार

 कोपार्डे : ‘कुंभी-कासारी’चे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी आज, शनिवारी गाळपासाठी येणाऱ्या उसाला एकरकमी २६४० रुपये प्रतिटन देण्याचे जाहीर केले. हा दर राज्यात उच्चांकी असून, देशातही गाळप हंगाम सुरू असणाऱ्या इतर कोणत्याही साखर कारखान्यापेक्षा किमान १०० रुपये, तर कमाल ३०० रुपयेने जास्त आहे. ‘कुंभी-कासारी’च्या मुख्य सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी राज्यातील ऊस उत्पादकांना दिलासा देणारा एकरकमी २६४० रुपये प्रतिटन जाहीर केले. आमदार नरके म्हणाले, सध्या बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल २४७५ ते २५०० रुपयांवर घसरले आहेत. सध्या राज्य बँक जी उत्पादित साखरेवर उचल देते आहे ते पाहता एफआरपी व ऊसदर देण्यासाठी मिळणारी उचल यामध्ये किमान ५०० ते ७०० रुपयांचा फरक पडत असून, प्रतिटन असणारी एफआरपी ही देण्यासाठी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. सध्या मागील हंगामावेळी अबकारी कराची कर्ज म्हणून दिलेल्या रकमेचे हप्ते भरण्यासाठी कारखान्यांकडे तगादा लागणार असून, ज्यावेळी केंद्रशासन एफआरपी जाहीर करते त्यावेळी उसापासून उत्पादित होणाऱ्या साखरेलाही किमान वैधानिक किंमत मिळण्यासाठी धोरण राबविले पाहिजे व साखरेचे बाजारातील दर स्थिर ठेवले पाहिजेत. सहकारी साखर कारखाने हे ऊसउत्पादक सभासदांच्या मालकीचे आहेत. संचालक मंडळ हे विश्वस्त आहेत. ‘कुंभी’च्या संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. इतर कारखान्याप्रमाणे तोडणी वाहतूक खर्च जादा दाखवून एफआरपी घटविणे, उतारा कमी दाखवणे असे प्रकार कुंभी-कासारीचे प्रशासन कधीही करत नाही. एफआरपी देणे हे कायद्यानेच बंधनकारक आहे, पण तसे असताना इतर कारखान्यांनी तो दिलेलाच नाही, त्याकडे ‘कुंभी’वर निवेदन देण्यासाठी येणाऱ्यांचे लक्ष का नाही? असा सवालही त्यांनी केला. कुंभी-कासारीच्या ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे २६३० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कुंभी बचाव मंचने कारखान्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आज दराची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखाना प्रशासनाने दर जाहीर केला. सरकारने मदत करावी दर घसरल्याने साखर कारखाने अडचणीत आले असून, त्यांना मदत करण्यासाठी कर्ज नव्हे, अनुदान द्यावे यासाठी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली आहे. यासाठी मुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांनी केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करण्याचे आश्वासन दिले आहे. जर साखरेचे दर असेच घसरत राहिले, तर सर्वच साखर कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये येतील व साखर उद्योग उद्ध्वस्त होईल, असी भीती नरके यांनी व्यक्त केली. आधी ऊस घाला, मग दर मागा दराची मागणी करण्यासाठी आलेल्यांमध्ये काहींनी आपला ऊस दालमिया व डी. वाय. पाटील कारखान्याला घालविला आहे. त्यांनी आपला ऊस पहिल्यांदा कुंभी-कासारीला पाठवावा आणि मगच दराची मागणी करावी, असे स्पष्ट आव्हान आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवेदने देण्यापेक्षा इतर कारखान्यांना ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांच्यात प्रबोधन करून कुंभीला ऊस पाठविण्याचा प्रयत्न करावा, असा टोला त्यांनी कुंभी बचाव मंचला लगावला. (वार्ताहर)