शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

हातकणंगले नगरपंचायत, हुपरी नगरपरिषदेसाठी प्रतीक्षा

By admin | Updated: June 24, 2016 00:45 IST

ग्रामस्थांमध्ये निराशा : नगरविकास विभागाकडून अंमलबजावणीच नाही

दत्ता बिडकर --हातकणंगले --शासनाने नगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी, कबनूर, हातकणंगले नगरपंचायती -नगरपरिषदासाठी शासनस्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नसल्याने या गावामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वरील तीनही गावांचा समावेश नगरविकास विभागाकडे होणार असल्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ठामपणे सांगत आहेत. मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे या गावाच्या पदरी निराशाच आली आहे.हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावच्या लोकसंख्येचा विचार होऊन ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी मोर्चा, उपोषण यासारखी आंदोलने करून हुपरी नगरपंचायतीची अधिसूचना काढण्यास शासनाला भाग पाडले. अधिसूचना काढून आठ-दहा महिने संपूनही अद्याप याबाबत नगरविकास विभागाने अंमलबजावणी केली नाही.आघाडी सरकारने राज्यातील तालुक्याची गावे नगरपंचायतींनी जोडण्याचा महत्त्वाकांशी निर्णय घेतला होता. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची गावे चार महिन्यांपूर्वी शासनाने नगरपंचायतीमध्ये रूपांतर केली. या नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर होत आहेत. शासनाने सांगली जिल्ह्याला वेगळा न्याय आणि कोल्हापूरला वेगळा ही भूमिका ठेवली आहे. हातकणंगले हे तालुक्याचे गाव असून गेली दोन वर्षे नगरपंचायत होण्यासाठी प्रतीक्षेत आहे.कबनूर ग्रामपंचायत इचलकरंजी शहराचा एक भाग बनून राहिली आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी या ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत. या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची परवानगी घेऊन तो मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी सादर केला आहे.वरील तीन ग्रामपंचायतींचा समावेश नगरविकास विभागाकडे झाल्यास तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची धास्ती अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.प्रस्ताव शासन दरबारीहुपरी आणि हातकणंगले ग्रामपंचायतीचे नगरपंचायती- नगरपरिषदासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजूर करून शासनाकडे पाठविले आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायती-नगरपरिषदामध्ये होईल, असे मत जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी व्यक्त केले.