शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

हातकणंगले नगरपंचायत, हुपरी नगरपरिषदेसाठी प्रतीक्षा

By admin | Updated: June 24, 2016 00:45 IST

ग्रामस्थांमध्ये निराशा : नगरविकास विभागाकडून अंमलबजावणीच नाही

दत्ता बिडकर --हातकणंगले --शासनाने नगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी, कबनूर, हातकणंगले नगरपंचायती -नगरपरिषदासाठी शासनस्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नसल्याने या गावामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वरील तीनही गावांचा समावेश नगरविकास विभागाकडे होणार असल्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ठामपणे सांगत आहेत. मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे या गावाच्या पदरी निराशाच आली आहे.हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावच्या लोकसंख्येचा विचार होऊन ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी मोर्चा, उपोषण यासारखी आंदोलने करून हुपरी नगरपंचायतीची अधिसूचना काढण्यास शासनाला भाग पाडले. अधिसूचना काढून आठ-दहा महिने संपूनही अद्याप याबाबत नगरविकास विभागाने अंमलबजावणी केली नाही.आघाडी सरकारने राज्यातील तालुक्याची गावे नगरपंचायतींनी जोडण्याचा महत्त्वाकांशी निर्णय घेतला होता. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची गावे चार महिन्यांपूर्वी शासनाने नगरपंचायतीमध्ये रूपांतर केली. या नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर होत आहेत. शासनाने सांगली जिल्ह्याला वेगळा न्याय आणि कोल्हापूरला वेगळा ही भूमिका ठेवली आहे. हातकणंगले हे तालुक्याचे गाव असून गेली दोन वर्षे नगरपंचायत होण्यासाठी प्रतीक्षेत आहे.कबनूर ग्रामपंचायत इचलकरंजी शहराचा एक भाग बनून राहिली आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी या ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत. या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची परवानगी घेऊन तो मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी सादर केला आहे.वरील तीन ग्रामपंचायतींचा समावेश नगरविकास विभागाकडे झाल्यास तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची धास्ती अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.प्रस्ताव शासन दरबारीहुपरी आणि हातकणंगले ग्रामपंचायतीचे नगरपंचायती- नगरपरिषदासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजूर करून शासनाकडे पाठविले आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायती-नगरपरिषदामध्ये होईल, असे मत जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी व्यक्त केले.