शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : केंद्र शासनाने कृषी कायदे रद्द करावे अन्यथा या नवीन कायद्यांमुळे देशातील शेतजमिनीवर ठराविक मूठभर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंदगड : केंद्र शासनाने कृषी कायदे रद्द करावे अन्यथा या नवीन कायद्यांमुळे देशातील शेतजमिनीवर ठराविक मूठभर उद्योगपतींची मालकी निर्माण होईल. शेती उत्पादनाला हमीभाव द्या, हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात, असे प्रतिपादन बेळगावच्या जी. एस. एस. कॉलेजचे माजी प्राचार्य कॉ. डॉ. आनंद मेणसे यांनी केले.

चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातर्फे वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण आणि शेतकऱ्यांचे आंदोलन’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. आय. पाटील होते. डॉ. आनंद मेणसे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक केले.

प्राचार्य मेणसे यांनी सांगितले की, बाजार समितीत वा बाजार समितीच्या बाहेर किमान आधारभूत किमतीनेच शेतमालाची खरेदी होईल, अशी तरतूद असलेले नवीन कायदे तयार झाले पाहिजेत. शासनाने कोणत्याही शेतकरी संघटनेशी चर्चा न करता व संसदेत कोणतीही चर्चा न करता आवश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे, बाजार समितीबाहेर शेतमालाच्या खरेदी-विक्रीला परवानगी देणे, कंत्राटी शेतीला मान्यता देणे या तीन कायद्यांचा तसेच शेतकरी आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला. आर. आय. पाटील यांनी शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे निर्माण होत असतील तर भारतासारखा कृषिप्रधान देश सुखी होणार नाही, असे सांगून प्रतिकूल परिस्थितीत ईस्रायलसारख्या देशाने कृषिक्रांती कशी घडवून आणली, याचा आढावा घेतला.

या चर्चासत्रात एस. व्ही. गुरबे, कीर्तीकुमार, एस. जी. सातवणेकर यांच्यासह र. भा. माडखोलकर महाविद्यालय, दि. न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. एस. एन. पाटील यांनी आभार मानले.