शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

‘शक्तिपीठ’बाबत चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:28 IST

मराठी आली पाहिजे, पण एवढा गवगवा कशासाठी?

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. कोणताही प्रकल्प राबविताना समर्थन आणि विरोध होत असतो. पण शक्तिपीठा महामार्गाबाबत चर्चेतून मार्ग काढण्याची शासनाची मानसिकता असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उपमुख्यमंत्री पवार हे शुक्रवारी सायंकाळी कराड येथील लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात शक्तिपीठ महामार्गाला बागायत शेती जात असल्याने शेतकऱ्यांचा विरोध आहे. काही शेतकऱ्यांनी समर्थनही दर्शविले आहे. पण ज्यांचा विरोध आहे, त्यांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता आहे.सुशील केडिया यांच्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, सुशील केडिया यांनी मूळ वक्तव्य कशावरून केले हे मला माहिती नाही. प्रत्येक राज्याची मातृभाषा आहे, ती आलीच पाहिजे. पण मुंबईमध्ये व्यवसायासह इतर कारणांसाठी वेगवेगळे भाषिक येत असतात. त्यांना लगेच मराठी येत नसेल तर त्या विषयाला किती महत्त्वाचे द्यायचे? एवढा गवगवा करण्याची गरज काय? असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी आमदार राजेश पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदेंचे भाषण ऐकलेच नाहीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पुण्यातील दोन कार्यक्रमांना आपण उपस्थित हाेतो. कराडला लग्नसमारंभ असल्याने अमित शाह यांची परवानगी घेऊन इकडे आलो. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलले हे मला माहीत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.