शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गोतेवाडी योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : कोते ...

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : कोते गावासह मानेवाडी व गोतेवाडी या गावांना २०१२-१३ च्या दरम्यान एक कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली. तेव्हा गावकऱ्यांनी पिण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडला; पण ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम पूर्ण न झाले ने तिथेच या योजनेचा फज्जा उडाला. या तीन गावांसाठी मंजूर झालेली एक कोटी रुपयांची ही योजना काही वर्षांतच कुचकामी ठरली. इतके पैसे खर्च करूनही गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.

दुसरीकडे घोटभर पाणी मिळवण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ही पाणी योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा बनली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला म्हणण्याची गत ग्रामस्थांवर आलेली आहे.

कोते ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोते गावासह मानेवाडी व गोतेवाडी या गावांचा समावेश होतो. २०१२-१३ साली कोते गावासह मानेवाडी, गोतेवाडी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास एक कोटी रुपयांची योजना मंजूर केली गेली.

कधी नव्हे ते गावात नळ जोडले गेले व नळांना पाणीही आले; पण एक कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या योजनेने नागरिकांचा भ्रमनिराश झाला. पाइपलाइनला वारंवार लागणारी गळती, अपुरा पाणीपुरवठा, ज्यादा लाइट बिल आकार व तुलनेत कमी पाणी मिळत असल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात भीषण पाणीटंचाई असून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांना गावभर वणवण करावी लागत आहे.

पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी या महिलांना गेल्या आठ दिवसांपासून गावाशेजारील कूपनलिका अथवा झऱ्यांचा आश्रय घ्यावा लागत आहे; पण कूपनलिकांची पाणीपातळीही खालावल्याने गावातील एकाच कूपनलिकेवर सकाळी मोठी गर्दी पहावयास मिळते आहे. यावेळी पाणी मिळवताना महिला वर्गात जोरदार भांडणे होताना पाहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया

गेल्या आठ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने का बघत नाही. गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्याची भाषा करणारे आता कुठे आहेत. किमान महिलांची भटकंती थांबवण्यासाठी तरी अशांनी पुढाकार घ्यावा.

- सचिन पाटील (सामाजिक कार्यकर्ते, कोते )

फोटो ओळी= गोतेवाडी (ता. राधानगरी) येथील शेती पंप व कूपनलिकेवरती पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची होत असलेली गर्दी.