शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी अभयारण्य रस्त्यांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : दीर्घकाळापासून रेंगाळलेली राधानगरी अभयारण्यग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : दीर्घकाळापासून रेंगाळलेली राधानगरी अभयारण्यग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध झालेल्या 25 कोटी निधीतून प्रलंबित रक्कम येत्या सात एप्रिल रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, असे वनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने प्रकल्पग्रस्तांच्या समस्येचा मालिकेद्वारे आढावा घेतल्याने ही प्रक्रिया सुरू होण्यास मदत झाली.

विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या 30 गावांपैकी न्यू करंजे, एजीवडे, दाऊतवाडी या गावांची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातील बहुतांश लोकांनी एकरकमी पॅकेजचा पर्याय स्वीकारला आहे. यापैकी काहींना पहिला हप्ता व काहींना दुसरा हप्ता मिळाला आहे. मात्र, त्यांची घरे, शेतजमिनी, झाडे या मालमत्तांच्या मूल्यांकनाची रक्कम अजून मिळालेले नाही. एकत्रित ही रक्कम 18 कोटी 72 लाख होते.

विविध पातळ्यांवर पाठपुरावा करून ही रक्कम उपलब्ध होत नव्हती. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे हा प्रश्न मांडला. यामुळे बळ मिळालेल्या अभयारण्यग्रस्तांनी चार दिवसांपूर्वी आज (ता.५) उपवनसंरक्षक कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा वन्यजीव विभागाला दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आज कोल्हापुरातील या कार्यालयात गेले होते.

यावेळी झालेल्या चर्चेत या निधीबरोबरच या लोकांना घरासाठी जागा देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारे दाखले एकाच वेळी व एकाच छताखाली देण्याची व्यवस्था करण्याचेही मान्य करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक व प्रकल्प अधिकारी रावसाहेब काळे, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी दीपक तेली, मनोज पाटील, प्रमोद कसबले, वैजनाथ किरमिटे, लक्ष्मण बिरंबोळे, संतोष बिरंबोळे, मज्जिद तांबोळी, प्रवीण सुतार, विलास कसबले आदी उपस्थित होते.

ठळक - महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी (महा कॅम्पा) नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक यांना दिलेल्या आदेशात केंद्र शासनाच्या वार्षिक नियोजन आराखडा योजनेतून मंजूर झालेल्या 25 कोटी रकमेतून प्रलंबित पुनर्वसन कामासाठी निधी वापरावा व केलेल्या कामाचा त्वरित अहवाल पाठवावा, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष अभयारण्यग्रस्तांना मिळण्यास कोणतीही अडचण नाही.