शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणात वादाचा नवा ‘पदर’

By admin | Updated: June 1, 2015 00:20 IST

सांगली-कोल्हापूर रस्ता : काम कोणीही करो, भूसंपादन कळीचा मुद्दा

सतीश पाटील - शिरोली -भूसंपादनाच्या तिढ्यात अडकलेले कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण आता शासन व रस्त्याचे काम करीत असलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यातील वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. काम संथगतीने सुरू असल्याने व वाहनधारकांना त्रास होत असल्याने सुप्रीम कंपनीकडून रस्त्याचे काम तातडीने काढून घेऊन ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे, तर कंपनी काम काढून घेतल्याने आपल्या केलेल्या कामाच्या योग्य मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेऊन राज्य शासनाच्या विरोधात दावा ठोकू शकते.बीओटी तत्त्वावरील सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रीम कंपनीने आॅक्टोबर २०१२ या वर्षात सुरू केले. ते ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करणे कंपनीस बंधनकारक होते, पण तीन वर्षांत बरेच काम अपूर्ण व संथगतीने सुरू असल्याने याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. म्हणूनच ३१ मे २०१५ पर्यंत काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली होती. मात्र, तरीही म्हणावी तशी कामात गती नसल्याने या रस्त्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून हा रस्ता टोलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आजपर्यंत सुप्रीम कंपनीने रस्त्यावर केलेल्या खर्चाची एकूण आकडेवारी घेऊन ती केंद्र शासनाला कळवली जाणार आहे आणि केंद्र शासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत कंपनीला नुकसानभरपाई देण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत सुप्रीम कंपनीच्या सूत्रांनी सांगितले, महाराष्ट्र शासन काम काढून घेणार असल्याबाबत आमच्या कंपनीशी कोणताही पत्रव्यवहार अद्याप तरी झालेला नाही. काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत पन्नास टक्केही जमिनीचा ताबा मिळालेला नाही. मग आम्ही काम पूर्ण कसे करणार? अजूनही सांगली, अंकली या दोन्ही गावांचे भूसंपादन झालेले नाही. २५ मेपर्यंत हे भूसंपादन पूर्ण करून जमिनी रस्त्यासाठी ताब्यात देतो, असे सांगलीचे भूविकास अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आश्वासनदिले होते. तमदलगे येथील घरांचा प्रश्न महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मागे राहिला आहे. धनगर समाजाच्या मंदिराचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. निमशिरगाव येथील शाळेला अद्याप जागा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे तो प्रश्न अपूर्ण आहे. हातकणंगले उड्डाणपुलावर तीन कोटी रुपये खर्च झाले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलाला ‘परवानगी नाही, काम थांबवा’, असे पत्र दिले. अतिग्रे येथील ज्या लोकांची घरे रस्त्यात जातात त्यांना घरे बांधण्यासाठी पर्यायी जागा पाहिजे, त्यामुळे येथील काम थांबले आहे, या सर्व अडचणी कंपनीसमोर अजून आहेत, मग काम कसे पूर्ण होणार? असा सवाल केला आहे. सुप्रीम कंपनीला वेळेत भूसंपादन करून मिळाले नसल्याने रस्त्याच्या कामास विलंब झाला आहे. सर्व भूसंपादन पूर्ण झाल्यावर एक महिन्यात कंपनी रस्ता पूर्ण करेल. आमचे काम काढून घेतले, तर आम्ही न्यायालयात जाऊन आमची बाजू मांडू. आमच्या ना हरकत परवान्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा अन्य कंपनी हे काम पुन्हा सुरू करू शकत नाही.- वरिष्ठ अधिकारी, सुप्रीम कंपनीपैसे जमा होऊनही वाटप नाहीहातकणंगले येथील जमिनीचे भूसंपादन होऊन कंपनीने प्रांत कार्यालयात पैसे जमा करूनही प्रांताधिकाऱ्यांनी लोकांचे पैसे वेळेवर का दिले नाहीत. प्रांत कार्यालयातून लोकांना पैसे देताना अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळेही रस्त्यास विलंब झाला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण वेळेवर पूर्ण होत नाही. सुप्रीम कंपनीला ३१ मे ची अंतिम तारीख दिली होती. काम संथगतीने सुरू असल्याने हे काम कंपनीकडून काढून घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून हा रस्ता टोलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री.