शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विविध ठिकाणी चार मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

कोडोलीतील विहिरीत बुडाल्याने शिवराज कृष्णात साळोखे (वय १४) व शुभम लक्ष्मण पाथरवट (१५ रा. वैभवनगर) याचा मृत्यू झाला तर ...

कोडोलीतील विहिरीत बुडाल्याने शिवराज कृष्णात साळोखे (वय १४) व शुभम लक्ष्मण पाथरवट (१५ रा. वैभवनगर) याचा मृत्यू झाला तर शिंगणापूर चंबुखडी (ता.करवीर) येथील म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या खाणीत बुडून यशराज राजू माळी (वय १६, रा. गणेशनगर, शिंगणापूर) याचा मृत्यू झाला. या ठिकाणी मारुती कस्तुरे (१७) या मुलास वाचविण्यात यश आले.

कोडोली येथील वैभवनगरातील सात ते आठ मुले रंगपंचमी खेळून बामनांच्या मळ्यात गजानन कापरे यांची विहिरीत पोहण्यास गेले होते. विहीर सुमारे तीस ते चाळीस फूट पाणी होते. पाण्यात उडी मारताच शिवराज व शुभम हे पाण्यात बुडू लागले सोबत आलेली मुले घाबरून पळून गेली. त्यांनी घरात सांगितल्यानंतर घरातील व शेजारी विहिरीजवळ गेल्यावर त्यांना विहिरीशेजारी दोघांची चपला कपडे असल्याचे लक्षात आले. तत्काळ नागरिकांनी पाण्यात उडी मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यांचा शोध लागला नाही. कोडोलीचे मंडल अधिकारी व तलाठ्यांनी कोल्हापुरातून व्हाईट आर्मी व कोडोलीच्या गनिमी कावा यांच्या कार्यकर्त्यांनी पाचारण केले. त्यांनी गळाच्या साहाय्याने प्रथम शुभमचा व त्यानंतर शिवराजचा मृतदेह बाहेर काढला. मृत शुभम लक्ष्मण पाथरवट याला आई, भाऊ तर शिवराज साळुंखे याला आई वडील, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

शिंगणापूर येथे राहणारा यशराज माळी हा दहावीत शिकणारा विद्यार्थी होता. मित्रांसोबत तो खाणीत आंघोळीसाठी गेला होता. यशराज व त्याचा सहकारी मारुती कस्तुरे यांना पोहता येत नव्हते. पाण्यात बुडू लागल्यानंतर त्यांच्या मित्रांनी मारुतीला पाण्याबाहेर काढले. या दरम्यान यशराज गाळात रूतल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. यशराजच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले असून पश्चात आई, दोन विवाहित बहिणी आहेत. त्याची आई भाजीपाला विक्री करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवते. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

कुरुंदवाड येथील रंगपंचमी खेळून आंघोळीस गेलेला अकिब यासीन बागवान (वय २४, ढेपणपूर, मशीदजवळ, कुरुंदवाड) याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना कुरुंदवाड-तेरवाड रस्त्यावरील गायकवाड पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या मालगावे यांच्या विहिरीत घडली. त्यांची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली. अकिबच्या बहिणीचे रविवारी लग्न आहे. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम घरात होता. तेथे जेवण केल्यानंतर त्याने नातेवाईकांसोबत रंगपंचमी खेळली. त्यानंतर तो त्यांच्यासोबतच पोहण्यास गेला होता. त्याने विहिरीत उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांनी शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला.