शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST

गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ...

गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ठिकाणी शेतकरी सर्रास पाचट जाळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान युगात ऊस शेती प्रगतीकडे वाटचाल करत आहे. तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी पाचट पेटवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुरु असलेल्या शासनाच्या पाचट अभियानाला खो बसत आहे.

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भागलनीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरीभरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये असणारे अज्ञान पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. ऊसामध्ये पाचट ठेवल्यास उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही, यासारख्या गैरसमजांमुळे शेतकऱ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण केला आहे तर उंदरांमुळे पाल्यामध्ये साप येतात, यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या खाईत महाराष्ट्र लोटला होता, त्यावेळी पाण्याचा जास्त वापर होणाऱ्या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाबरोबरच पाचट ठेवण्याची आवश्यकता आहे. पाचट ठेवल्याने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. जमिनीमध्ये ओलावा राहिल्याने पिके हिरवीगार दिसतात. त्याचा परिणाम होऊन रासायनिक खतांचा वापर कमी होतो. शेतकऱ्याचे आर्थिक बजेट सुधारण्यास मदत होते.