शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी १५ कि.मी.चा फेरा

By admin | Updated: November 27, 2015 01:03 IST

गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी : भोगावती नदीवरील नवीन पुलाचा प्रस्ताव ६० वर्षे लालफितीत

सडोली खालसा : करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी दरम्यान भोगावती नदीपात्रात नवीन पुलाचा प्रस्ताव तब्बल ६० वर्षे अडगळीत पडला आहे. यामुळे करवीर पश्चिम भागासह राधानगरी तालुक्यातील जनतेला १५ किलोमीटर लांब पल्ल्याने प्रवास करावा लागत आहे. पूल झाला नसल्यामुळे दोन्ही तालुक्यांतील गावांचा दळण-वळणाचा प्रश्न स्वातंत्र्यकाळापासून रेंगाळला आहे. करवीर तालुक्याचा पूर्व भाग व पश्चिम भाग असे दोन भाग पडले आहे. तालुक्याचा पूर्व भाग हा कोल्हापूर शहराच्या जवळ असल्यामुळे या भागात रस्ते व सुखसोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु पश्चिम भागातील गावांना कोल्हापूर शहरात जाण्यासाठी हळदीमार्गे ३५ ते ४० किलोमीटर, तर बीडमार्गे ४० ते ४५ किलोमीटर अंतर आहे. जादा अंतर होत असल्यामुळे करवीर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावे शहरापासून दुरावत आहेत. यासाठी गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथे भोगावती नदीवर पूल व बंधारा शासनाने मंजूर केल्यास हेच अंतर १५ ते २० किलोमीटर होईल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा निश्चितच विकास व्हायला वेळ लागणार नाही. गोवा-राधानगरी-करवीर या पश्चिम भागातील प्रवासाचे १५ ते २० किलोमीटर अंतर कमी होणार असून वेळ, इंधन, पैसा यांची बचत होणार आहे.करवीरच्या पश्चिम भागातील व राधानगरीच्या मुख्य वाहतुकीच्या सोयीचा असणारा आरे-पिरळ हा रस्ता गाडेगोंडवाडी गावामधून गेला आहे. या रस्त्यावरून राधानगरीकडे जाण्यासाठी गगनबावडा, रत्नागिरीहून येणारी वाहतूक कोल्हापूरकडे न जाता कुडित्रे-सावरवाडी-आरे मार्गे राधानगरीकडे बायपास मार्गाने होते. गाडेगोंडवाडी परिसरातील नदीपात्र खोल असल्यामुळे येथे पुराचे पाणी जास्त पसरत नाही. पूर आला तरी कोल्हापूर-राधानगरी-गोवा वाहतूक सुरू राहून कोल्हापूर शहराचा संपर्क तुटणार नाही. या पुलाची गरज ओळखून आरे ग्रामपंचायतीने करवीर व राधानगरी तालुक्यांतील प्रवाशांच्या मागणीनुसार गाडेगोंडवाडी येथे पूल व्हावा, या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, परंतु आमदार व खासदारांची इच्छाशक्ती नसल्यामुळे हा प्रस्ताव गेल्या ६० वर्षांपासून शासनाकडे धूळ खात पडला आहे. नेत्यांचे आश्वासन हवेतचजुन्या पिढीतील १९३० ते १९७५ पर्यंत गाडेगोंडवाडी येथून होडीतून व दगडी बंधाऱ्यावरून राधानगरी व करवीर तालुक्यांतील नागरिक तांदूळ, शेणी, गूळ विक्री करण्यासाठी कोल्हापूर शहराकडे जात होते. त्यावेळीपासून भोगावती नदीवर पूल बांधावा, अशी मागणी प्रवाशांतून होत होती; परंतु निवडणुकीपुरतीच नेतेमंडळी आश्वासन देऊन या परिसरातील जनतेची दिशाभूल करतात. निवडणुकीनंतर ही आश्वासने हवेत विरतात. स्वातंत्र्यापासून गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी हा पूल व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून, गाडेगोंडवाडी पश्चिम भागाचा रोजगार, उद्योग आणि शहर जवळ यावे यासाठी प्रयत्न करणार आहे. - निवृत्ती मेटील, सरपंच, ग्रामपंचायत, गाडेगोंडवाडी