शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे करून दीड वर्ष लोटले तरी दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने ...

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने पंचनाम्याचे सोपस्कारही झाले, नुकसानभरपाईचा ७९ कोटींचा आकडाही निश्चित झाला. आता या सर्व घटनाक्रमाला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; पण यातील दमडीची मदत ना कृषिपंपधारक शेतकऱ्यांना मिळाली ना महावितरणला.

कोल्हापूूर जिल्ह्याने ऑगस्ट २०१९ मध्ये अभूतपूर्व अशा महापुराचा सामना केला. आठ दिवसांनी महापूर ओसरला तरी यात महावितरणची बहुतांश यंत्रणा गाळात रुतून बसली, काही वाहून गेली. यात कृषिपंपाची अवस्था तर त्याहून बिकट होती. नदीकाठच वाहून गेल्याने मोटारी डीपीसह वाहून गेल्या. कोल्हापुरातून राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत यानिमित्ताने गाठीभेटी घेण्यात आल्या. याचे पंचनामे सुरू करण्यात आले, तोपर्यंत राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्याने हा सर्व विषय मागे पडला. सतेज पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन पंचनामे करून तयार झालेल्या अहवालानुसार नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी २८ लाख रुपये शासन देईल, असे जाहीर केले. या घटनेलाही आता नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी केलेल्या घोषणेप्रमाणे एक रुपयाचीही मदत अद्याप मिळालेली नाही.

चौकट ०१

महापुरात झालेले नुकसान

महावितरण: ६५ कोटी ४४ लाख

कृषिपंपधारक: १३ कोटी ८४ लाख

वैयक्तिक पंचनामा झालेले कृषी ग्राहक: ७ हजार ८८९

पंचनामा केलेल्या सिंचन योजना: २८०

चौकट ०२

महावितरणचे नुकसान

महापुरात महावितरणच्या जिल्ह्यातील २६ उपकेंद्रांत शेती व बिगरशेती असे वर्गीकरण करून बाधित संख्या काढण्यात आली. यात बिगरशेतीमध्ये ग्राहकांचे उच्चदाब वाहिन्या ५४८, रोहित्र ३५७० उच्चदाब खांब १२५, लघुदाब खांब ३१६ अशा २ लाख ४१ हजार ३९८ ग्राहकांचे नुकसान झाले. शेतीवर्गात उच्च दाब वाहिन्या २१८, रोहित्र ७ हजार ६०१, उच्चदाब खांब १५८१, लघुदाब खांब ५ हजार ५७ अशा ९६ हजार ६२१ ग्राहकांचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया

शासन ढिम्म आहे. आधी कृषिपंपधारकांना झुलवले, आता घरगुती ग्राहकांना झुलवत आहे. दीड- दोन वर्षे जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही.

-विक्रांत पाटील किणीकर, राज्य इरिगेशन फेडरेशन