शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘गाळयुक्त शिवार’साठी विभागीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 01:01 IST

विभागीय आयुक्त अध्यक्ष : जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांवर ठेवणार नियंत्रण; शासनाचा निर्णय

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार अभियाना’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य शासनाने यंदापासून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यांची जिल्हास्तरीय समिती यापूर्वीच स्थापन झाली असून, नुकतीच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची विभागीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हा व तालुकास्तरांवरील समित्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहे.राज्यातील २५० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची ‘विभागीय सनियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली आहे.या समितीमध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे अध्यक्ष असून, इतर आठजणांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यात गाळयुक्त शिवार अंतर्गत कामकाजाची माहिती जिल्हास्तरावरील समितीकडून घेणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील समित्या स्थापन झाल्या आहेत. राज्य समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव, तर जिल्हा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी व तालुक्याचे अध्यक्ष हे संबंधित प्रांताधिकारी आहेत. आता विभागीय समिती स्थापन झाली आहे.सध्या या योजनेंतर्गत काम सुरू झाले असून जिल्हास्तरीय समितीकडून तालुकास्तरीय समितीकडून दर आठवड्याला किती गाळ काढला याबाबत आढावा घेतला जात आहे. गाळ साचलेल्या धरणालगत क्षेत्रातील शेतकरी किंवा अशासकीय संस्था हा गाळ स्वखर्चाने काढून न्यायचा असून याबाबत संबंधित तहसीलदार, तलाठी, धरण यंत्रणा उपअभियंता यांना माहिती द्यावयाची आहे. या गाळावर कोणतेही शुल्क सरकारकडून आकारले जात नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व त्यांनी स्वखर्चाने हा गाळ वाहून नेणे, अशी अट ठेवण्यात आली आहे.