शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाच्या निधी वाटप वादावर आठ महिन्यांनी पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा समान निधी वाटपाचा शब्द आणि सदस्यांच्या भावनांचा आदर करून तक्रारदार वंदना मगदूम यांनी ...

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा समान निधी वाटपाचा शब्द आणि सदस्यांच्या भावनांचा आदर करून तक्रारदार वंदना मगदूम यांनी मुंबई उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची कार्यवाही बुधवारी सुरू केली व त्यानुसार इचलकरंजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. आज गुरुवारी ते मुंबईला पाठवले जाणार असून, ३ मार्चच्या आत ही याचिका रद्द होणार आहे. या निर्णयामुळे १५ व्या वित्त आयोगावरून गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला न्यायालयीन व जिल्हा परिषद स्तरावरील संघर्ष संपुष्टात आला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या १२ कोटींच्या निधी वाटपात पदाधिकारी व सत्ताधाऱ्यांनी जास्त निधी घेऊन विरोधकांना डावलले होते. यावरून ऑगस्टमध्ये माजी महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांच्या वतीने माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी समान वाटपाची पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली. पण त्यांनी न जुमानल्याने २६ जूनच्या शासन परिपत्रकानुसार निधी वाटप करावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ऑगस्टमध्ये याचिका दाखल केल्यापासून गेले आठ महिने बऱ्याच घडामोडी घडल्या. १२ कोटींचा निधी येऊनही तो खर्च करता आला नाही, तो परत जाणार असल्याने अखेर सर्व न्यायालयीन खेळ खेळल्यानंतर अखेर उपाध्यक्ष सतीश पाटील व ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी शिष्टाई करत याचिकाकर्ते व सत्ताधाऱ्यांची बैठक घेतली. मंत्री मुश्रीफ यांनी स्वत: लक्ष घालत सर्वांना समान निधी दिला जाईल, असा शब्द दिला. या बदल्यात याचिका मागे घेण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे बुधवारी वंदना मगदूम यांनी इचलकरंजी न्यायालयात जाऊन याचिका मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र भरून दिले.

चौकट ०१

आणखी १२ कोटी

पंधराव्या वित्त आयोगातू्न जुलैमध्ये जिल्हा परिषदेला १२ कोटींचा निधी आला आहे, आता आणखी १२ कोटींचा निधी चारच दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ९ महिन्यांच्या अंतरात तब्बल २४ कोटी रुपये आले असल्याने सदस्यांना अक्षरशा लॉटरी लागली असून, रखडलेल्या विकासाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

प्रतिक्रिया

सभागृहाचा कार्यकाल संपत आला आहे. निधी नसल्याने विकासकामावर परिणाम होत आहे. आलेला निधीही खर्च करता आला नाही तर मतदारांना काय उत्तर देणार, असा सर्वच सदस्यांचा सूर असल्याने सर्वांच्या भावनेची कदर करून याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राजू मगदूम,

सरपंच माणगाव व याचिकाकर्ते