शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 5:15 PM

आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचलावझरे, खोतवाडी, पेरणोलीसह भुदरगड सिमाभागाला धोका

आजरा :आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.भुदरगड व आजरा तालुक्याच्या सीमेलगत २५ ते ३० किलोमीटर लांबीचा व १ हजार फूट उंचीच्या जंगलाने व्यापलेला हा कडा आहे. कड्यावरच्या कांही अंतरावर मैदानी पठार आहे तर कांही भाग घनदाट झाडांनी व्यापला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या कड्याच्या इतिहासात कड्याला प्रथमच धोका निर्माण झाला आहे.१९८३ नंतर प्रथमच दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडीजवळील १ हजार फूट उंच असलेल्या कड्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पहिल्यांदाच या भेगा नागरिकांना दिसल्याने दोन्ही तालुक्यातील कड्याच्या क्षेत्रातील गावामध्ये भिती पसरली आहे.कड्याला आडव्या भेगा पडल्या आहेत. भेगा पाच ते सात किलोमीटर अंतरावर पडून कडा खचल्याने खोतवाडी, वझरे व नावलकरवाडी या वस्त्यांना प्राथमिक स्तरावर धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसापासून ग्रामस्थामध्ये घालमेल सुरू आहे. खोतवाडी येथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर हा कडा आहे. कड्याच्या कांही अंतरावरच खोतवाडी, नालकरवाडी या वस्त्यासह वझरे गाव वसलेले आहे. कड्यावर मोठे दगड व झाडे आहेत.भेगा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने दगड, झाडे कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतात अशी परिस्थितीत तयार झाली झाली. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.या गावांना आहे धोकाआजरा तालुक्यातील खोतवाडी, वझरे, पेरणोलीपैकी नावलकरवाडी, हरपवडेपैकी धनगरवाडा तर भुदरगड तालुक्यातील मेघोली, मेघोलीपैकी धनगरवाडा, तळकरवाडी या वस्त्या व गावांना धोका पोहचू शकतो.----------------------------* प्रशासनाकडून दक्षतेची गरजतालुक्यात व जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे प्रशासनाचे या घटनेकडे लक्ष गेलेल नाही. दोन्ही तालुक्यातील सीमाभागातील गावांना सतर्कतेसाठी प्रशासनाने दक्ष राहून सतर्कतेचा आदेश देण्याची गरज आहे.----------------------------फोटो ओळी : आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी येथील शिवबाची राई’ या कठड्या अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कठ्यावरील माती व वृक्ष उन्मळून पडत असल्याने या परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.क्रमांक : १२०८२०१९-गड-०१/०२

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर