शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

Kolhapur flood: वीस हजार लिटर दूध घरात, दोन हजार क्विंटल भाजीपाला शिवारात; शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:37 IST

सात आगारांतून एसटीच्या १५५ फेऱ्या रद्द

कोल्हापूर : जिल्ह्यातील नद्यांना महापूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात २० हजार लिटर दूध घरात तर रोज दोन हजार क्विंटल भाजीपाला शिवारात राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे पिके पाण्याखाली असल्याने ती खराब होण्याची भीती असताना दूध, भाजीपाल्याची वाहतूक थांबल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे.मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प आहे. त्याचा रहदारीवर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर दूध व भाजीपाला वाहतुकीला अडचणी येत आहेत.

वाचा - पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरुगगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात दूध वाहतुकीची अडचण आहे. ‘गोकुळ’ दूध संघाचे गेल्या तीन दिवसांत १६ हजार लिटर तर इतर दूध संघांचे सुमारे ४ हजार असे २० हजार लिटर दूध घरातच राहिले आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याची आवकही घटली असून कोल्हापूर बाजार समितीत मागील गुरुवारी (दि. १४) ३२०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. मात्र, या आठवड्यात आवक निम्म्यावर आली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर बाजार समितीलाही बसला आहे.बल्क कुलर फुल्ल..!‘गोकुळ’च्या वतीने अनेक ठिकाणी बल्क कुलर बसवले आहेत. पण, गेल्या दोन दिवसांत पुराच्या पाण्यामुळे दुधाची उचल न झाल्याने बल्क कुलर फुल्ल झाल्याचे समजते.सात आगारांतून एसटीच्या १५५ फेऱ्या रद्दअतिवृष्टीचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला आहे. गेल्या चार दिवसांत १९ लाख ३९ हजार ३३६ रुपयांचा तोटा झाला आहे. तर गुरुवारी कोल्हापूर विभागाच्या सात आगारांतून विविध मार्गांवरील १५५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.