शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘गटशेती’तून संपन्नता साधावी-- के. पी. विश्वनाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:01 IST

कोल्हापूर : दिवसेंदिवस कमी होणारे शेतीक्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेतकºयांनी आर्थिक संपन्नता साधावी

ठळक मुद्दे कृषी तंत्रज्ञान महोत्सव; प्रदर्शनाचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिवसेंदिवस कमी होणारे शेतीक्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेतकºयांनी आर्थिक संपन्नता साधावी, असे आवाहन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी गुरुवारी येथे केले.शासनाचा कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव, प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कृषी महाविद्यालयातील या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषी सहसंचालक महावीर जंगटे प्रमुख उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले, किमान वीस शेतकºयांनी एकत्र येऊन शंभर एकरांवर गटशेतीचा प्रकल्प हाती घेतल्यास शासनाकडून अनुदानही उपलब्ध होत असल्याने हा प्रयोग शेतकºयांच्या जीवनात निश्चितपणे आर्थिक स्थैर्य निर्माण करणारा आहे. कृषी तंत्रज्ञानाद्वारे लाभदायी शेती करण्यासह एकात्मिक पीक पद्धतीचा शेतकºयांनी अवलंब करावा. कृषी पदवीधराने एका गावाची जबाबदारी उचलून आधुनिक तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचवावे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याकामी कृषी विभागाने आणि कृषी पदवीधारकांनी सक्रिय योगदान द्यावे. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम, शेतीनिष्ठ शेतकरी संजीव माने, आदी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जी. खोत यांनी प्रास्ताविक केले. शतानंद लोमटे, प्रियांका शेवाळे, नीलोफर सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय तरडे यांनी आभार मानले. दरम्यान, उसावरील हुमणी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ३५ लाखांचा निधी दिला आहे. त्यातून विकसित केलेल्या हुमणी कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉ. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे दर्शनया प्रदर्शनात १५ हून अधिक ऊस जातीचे वाण, विविध प्रकारच्या बियाण्यांचे वाण, यांत्रिक औजारे, पिकांचे मूल्यवर्धन तंत्रज्ञान, औषधे, जैविक खते, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिके, कृषी औजारे मांडली होती. जैनापूरच्या शरद कॉलेज आॅफ अ‍ॅग्रीकल्चरमधील विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पनांतून साकारलेले शेंगा, मका सोलण्याचे, शेंगा फोडण्याचे यंत्र, स्प्रे मशीन, तर डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लसूण सोलणे, शहाळे सोलणे आदी यंत्रे प्रदर्शनात ठेवली होती. प्रदर्शन शनिवार (दि. १४)पर्यंत आहे.