शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
3
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
4
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
5
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
6
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
11
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
14
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
15
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
16
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
17
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
18
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
19
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
20
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

वासनोली धरणाचा सांडवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कडगाव/वार्ताहर : वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याला भले मोठे भगदाड पडल्याने धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा ...

कडगाव/वार्ताहर : वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याला भले मोठे भगदाड पडल्याने धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे, तर सांडव्यातील माती, दगडगोटे वाहून जाऊन शेजारील शेत व विहिरी गाळाने बुजल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य जलसंधारण विभागाने २०११ साली या धरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. धरणाचे काम रखडत ठेवल्याने ७ कोटी रुपयांवरून तब्बल १४ कोटी रुपयांवर धरणाचा खर्च झाला, पण अद्यापही धरणाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. धरणात ९९० घनमीटर पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या धरणाचा लाभ वासनोली, तिरवडे, कडगाव पंचक्रोशीतील सुमारे हजार हेक्टर शेतीला होईल, या आशेने येथील शेतकऱ्यांनी धरण उभारण्यासाठी कवडीमोलाने जमिनी दिल्या आहेत.

धरणाची मुख्य भिंत बांधताना योग्य पद्धतीने बांधलेली नाही. सर्वेक्षण न करता सांडव्याची निवड केली गेली आहे. सांडव्याची उभारणी करताना बर्म केले नाहीत. पिचिंगचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले गेलेे. यामुळे धरणाचे भवितव्य धोक्यात असल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद मोरे यांनी भुदरगड तहसीलदार कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग कार्यालयासमोर उपोषण करून ठेकेदार व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे हे धरण चांगलेच चर्चेत आले होते.

पहिल्याच पावसात धरणातील सांडवा तुटण्यास सुरुवात झाली होती. मात्र, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मुसळधार पावसात सांडवा तुटून जाऊन भले मोठे भगदाड पडले आहे. सांडव्यातील पाण्याने सुमारे ४० ते ४५ फूट खोल, ५० फूट रुंद व १०० फूट लांबीचे भले मोठे भगदाड पाडले आहे. या भगदाडातील शेकडो ट्रक माती व दगड वाहून जाऊन शेतामध्ये पडल्याने विहिरी बुजल्या आहेत, तर विलास पाटील, अशोक मुळीक, केरबा पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजाराम पाटील, नारायण गुरव, विष्णू पाटील, सुरेश पाटील, धोंडिराम पाटील या शेतकऱ्यांचे मोटरपंप वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

चौकट

धरणाचा सांडवा तुटून भले मोठे भगदाड पडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. हे भगदाड तातडीने दुरुस्त केले नाही तर वासनोली, तिरवडे, कडगाव गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

फोटो : वासणोली धरणाचा सांडवा तुटून मोठे भगदाड पडले.