शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित करू नये

By admin | Updated: September 2, 2015 23:26 IST

हुपरीतील शासकीय जमीन : रौप्यनगरवासीय-शासन असा वाद उफाळून येण्याची शक्यता

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्यासमोर अगदी मोक्याच्या ठिकाणी असणारी गट नंबर ९२५/८ ‘अ’ ही कोट्यवधी रुपये किमतीची शासकीय जमीन, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित न करता शहरातील सार्वजनिक प्रयोजनासाठी व गोरगरीब गरजू, बेघर तसेच मागासवर्गीय कुटुंबांसाठीच राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर कांबळे व सामाजिक कार्यकर्ते उदय कंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, याबाबतचा ठरावही १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. परिणामी याप्रश्नी रौप्यनगरवासीय व शासन असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.निवेदनात म्हटले आहे, रौप्यनगरी हुपरी या निमशहरी गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराचा पारंपरिक चांदी व्यवसाय, साखर कारखाना, सूतगिरण्या, पंचतारांकित औद्योगिक वसाहतींच्या उभारणीमुळे परिसरामध्येही औद्योगिकीकरण झपाट्याने होत आहे. नजीकच्या काळामध्ये याठिकाणी नगरपरिषदेचीही उभारणी होणार आहे. परिणामी, भविष्यातील नागरी वसाहतींसाठी जमीन अपुरी पडण्याचा धोका संभवतो आहे. तसेच सार्वजनिक विकासासाठी जागेची मोठ्या प्रमाणात उणीव भासणार आहे. शहराचा चेहरा धारण केलेल्या रौप्यनगरीमध्ये सार्वजनिक एकही बाग, उद्यान नाही. तसेच भविष्यकाळामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचाही फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. भविष्यकाळातील या धोक्यांची जाणीव प्रशासनाने ठेवून सर्वांसाठी अत्यंत सोयीस्कर आणि शहरालगत उपलब्ध असणाऱ्या गट नंबर ९२५/८ ‘अ’ पैकी उपलब्ध असणारी ७ हेक्टर १७ आर ही सरकारी कब्जा असणारी जमीन धरणग्रस्तांसाठी आरक्षित करण्यात येऊ नये, अन्यथा रौप्यनगरीवासीयांचे फार मोठे नुकसान होण्याचा धोका संभवतो. (वार्ताहर)

दरम्यान, या जागेप्रश्नी १५ आॅगस्टला आयोजित ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही सरकारी जमीन संपादित करण्यात येऊ नये, असा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाचे सूचक आहेत विद्याधर कांबळे व अनुमोदक आहेत श्रीकांत प्रभाकर पोतदार. परिणामी, याप्रश्नी रौप्यनगरीवासीय व शासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.