शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण महाराष्ट्राला अवकाळीचा दणका

By admin | Updated: November 14, 2014 23:56 IST

गुऱ्हाळघरे, द्राक्षबागा व स्ट्रॉबेरीच्या पिकावर दुष्परिणाम

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा आज, शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे कोल्हापुरातील गुऱ्हाळघरांवर, कारखान्यांच्या हंगामावर परिणाम झाला आहे, तर सांगलीतील द्राक्षबागांवर दावण्या व करप्या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका महाबळेश्वर, पाचणगीसह जावळी खोऱ्यातील स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे.मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर गांगरलेकोल्हापुरात दिवसभर सूर्यदर्शन नाही. पहाटेपासून पावसाची वैताग आणणारी रिपरिप. हवेतला गारठा आणि सगळ्यांतला उत्साह हरवून टाकणारे वातावरण अशी आज, शुक्रवारी दिवसभराची कोल्हापुरातील स्थिती होती. लोकांना हिवाळ्यातील पावसाचा त्रासदायक अनुभव घ्यावा लागला. पाऊस धड मोठा नव्हता; परंतु तो थांबतही नव्हता, याचाच लोकांना जास्त वैताग आला होता. पावसाच्या रिपरिपीमुळे भाजी मंडई ओस पडली. व्यापारावर परिणाम झाला. सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. रब्बीच्या पिकांचे नुकसान करणारा हा पाऊस गूळ व साखर कारखानदारीच्याही अडचणीत भर घालणारा ठरला आहे.सांगलीत द्राक्षबागांना फटकासांगली : जिल्ह्यातील मिरज, तासगाव, खानापूर, पलूस या तालुक्यांतील काही भागात आज, शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. ढगाळ हवामान आणि पावसामुळे फुलोऱ्यातील द्राक्षबागांत फळकूज होण्याची शक्यता असून, दावण्या व करपा रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच परिसरातील द्राक्षबागायतदार औषधांची फवारणी करण्यात गुंतले होते. या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकांना मात्र जीवदान मिळाले आहे. या पावसाचा जोर येत्या ४८ तासांत कायम राहणार असल्याचे, तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्गात संततधार; आंबा काजूला फटकाकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, शुक्रवारी पावसाची संततधार सुरू होती. भातकापणी पूर्ण होण्यापूर्वी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्याचबरोबर या पावसाने साथरोगांच्या फैलावाचाही धोका वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे देवगडात मच्छिमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर ठेवणे पसंत केले. अवेळी आलेल्या या पावसाने काजूच्या झाडांना पालवी येईल. त्यामुळे फळधारणेची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. त्याचा फटका काजू पिकाला बसणार आहे. रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊसरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या भातपिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांत दिवसभर संततधार सुरूच होती. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या आंबा मोहोरावर या बदलत्या वातावरणाचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)