शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये ‘डीसीसी’चाच फॉर्म्युला

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

राजकीय जुळवाजुळव : दीड महिन्यात निवडणूक, मतदारांमध्ये जत तालुक्याचे वर्चस्व

अंजर अथणीकर / सांगली सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्याने आगामी दीड महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी या निवडणुकीतही जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच फॉर्म्युला वापरण्याची शक्यता राजकीत वर्तुळातून व्यक्त होत आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाच गटामध्ये होते. त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदार संघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदार संघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदार संघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी-विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक नियुक्त आहेत. येत्या १५ मेपर्यंत अंतिम मतदारयादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी विकास सोसायट्यांचे संचालक सरसकट १७ वरून १३ करण्यात आल्याने मतदार संख्येतही घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार जत तालुक्यातील आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात याचा विस्तार आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार हे एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. मात्र या पॅनेलचा कालावधी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. गेल्या अडीच वर्षापासून या संस्थेवर प्रशासक आहे. इतक्या मोठ्या कालावधीसाठी पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. गत निवडणुकीत राजकीय वैमनस्य असले तरी, प्रशासक नियुक्तीच्या अडीच वर्षाच्या काळात बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या मदन पाटील गटाची एकी झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील एकत्र आले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्यामुळे त्यांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न झाले आहेत. यामुळे काँग्रेसमधील पतंगराव कदम गट बाजूला पडला आहे. जिल्हा बँकेचा हा फॉर्म्युला बाजार समितीतही वापरला जाण्याची शक्यता आहे. पतंगराव कदम आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची वेगळी आघाडी होण्याची शक्यता असल्याचे माजी संचालकांकडून बोलले जात आहे. या निवडणुकीतही कदम गटाने ताकदीने उतरण्याचा इशारा दिल्याने, ही निवडणूक चुरशीने होण्याची शक्यता आहे. निवडणूक आता तोंडावर आल्याने राजकीय जुळवाजुळवीला वेग आला आहे.