शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘भाकप’च्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला

By admin | Updated: May 15, 2015 00:02 IST

वाहतूक ठप्प : भूमी अधिग्रहण कायद्यातील बदलाला विरोध, आंदोलकांची ताब्यात घेऊन सुटका

कोल्हापूर : भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. याला विरोध करीत २०१३ साली शेतकरी हित लक्षात घेऊन मंजूर झालेलाच कायदा संमत करावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गुरुवारी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. आंदोलकांनी तब्बल अर्धा तास ठिय्या मारल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सुटका केली. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ‘भाकप’चे कार्यकर्ते शिरोली टोलनाका येथे जमायला सुरुवात झाली. काही वेळानंतर कार्यकर्ते या ठिकाणी जमले. त्यानंतर भाकपचे नेते नामदेव गावडे, दिलीप पवार, मेघा पानसरे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलक चालत तावडे हॉटेलकडे निघाले. कायद्यातील बदलाला विरोध असणारे आंदोलकांच्या हातातील फलक लक्ष वेधत होते. महामार्गावर आल्यानंतर थेट ठिय्या मारून त्यांनी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा व पुण्याकडून कोल्हापूरला येणारा महामार्ग रोखला. महामार्गावरील आंदोलन असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ‘मोदी सरकार चले जाव...’, ‘भूमी अधिग्रहण कायदा हाणून पाडा...’, ‘शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...’, ‘लाल बावटे की जय...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तब्बल अर्धा तास आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही वेळानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस व्हॅनमधून ताराबाई पार्क येथील अलंकार हॉल येथे नेण्यात आले. काही वेळानंतर येथून सर्वांची सुटका करण्यात आली.नामदेव गावडे म्हणाले, भाकपच्या पुडुचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेतील निर्णयानुसार देशव्यापी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येत आहे. १८९४ चा भूमी अधिग्रहण कायदा बदलण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन एकमताने २०१३ मध्ये भूमी अधिग्रहण कायदा मंजूर करण्यात आला. भाजपच्या नेत्या सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने सुचविलेल्या सर्व शिफारशी एकमताने मंजूर झाल्या. त्यानंतर लोकसभा व राज्यसभेत हा कायदा एकमताने मंजूर झाला. असे असताना सध्याचे मोदी सरकार या कायद्यामध्ये बदल करू पाहत आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. सरकारने २०१३च्या कायद्याची अंमलबजावणी करावी; अन्यथा सरकारचे कोणतेही कामकाज चालू देणार नाही.एस. बी. पाटील म्हणाले, या सरकारने उद्योगपतींना जमिनी देण्यासाठी भूमी अधिग्रहण कायद्यातील बदलाचा घाट घातला आहे. उद्योगपतींनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.रघुनाथ कांबळे म्हणाले, हे सरकार मनमानीपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घालीत आहे. एका बाजूला सर्वसामान्यांना अन्नधान्य देणार म्हणता आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पिकाऊ जमिनी ताब्यात घेण्यासाठी धडपड सुरू आहे.आंदोलनात सुशीला यादव, बाबा यादव, शिवाजी माळी, कृष्णात पानसे, अनिल चव्हाण, महादेव आवटे, दिलदार मुजावर, संजय पाटील, बळवंत पोवार, अतुल कवाळे, अरुण देवकुळे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)