शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचा तडाखा :गूळ हंगाम आला अडचणीत, गुऱ्हाळघरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:31 IST

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून  गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात  गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच  गुऱ्हाळमालकांसमोर आहे. यंदाच्या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे महापुराचा तडाखा :गूळ हंगाम आला अडचणीत, गुऱ्हाळघरांची पडझडऊस कुजल्याने २.१० लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून  गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात  गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच  गुऱ्हाळमालकांसमोर आहे. यंदाच्या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.‘कोल्हापुरी चप्पल’, ‘कोल्हापूर पद्धतीचा बंधारा’ याबरोबरच कोल्हापूरची आणखी ओळख म्हणजे ‘गूळ’ आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी येथे गुळाची बाजारपेठ वसविली आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिले. कोल्हापूरची माती आणि पाण्यामुळे येथील प्रत्येक शेतीमालाला वेगळी चव आहे. येथील कणीदार गुळाची चव काही औरच असते. त्यामुळे गुजरातसह देशातील अनेक बाजारपेठांत कोल्हापुरी गुळाला मागणी आहे.

काळाच्या ओघात साखर कारखाने उभे राहू लागल्याने  गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत गेली. गुळाचा अनिश्चित दर आणि साखर कारखान्यांमधील ऊसदराच्या स्पर्धेमुळे  गुऱ्हाळघरे मोडकळीस आली. सध्या जिल्ह्यात १५०-२००  गुऱ्हाळघरे सुरू आहेत.

यांपैकी सर्वाधिक  गुऱ्हाळघरे करवीर, पन्हाळा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत आहेत. वर्षाला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २५ लाख गूळ रव्यांची आवक होते. उसाची वाढलेल्या ‘एफआरपी’च्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक साखर कारखान्यांकडे वळले आहेत.यंदा अतिवृष्टी व महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा फटका बसला असून, त्यामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाजानुसार ७५ हजार हेक्टरांवरील ऊसपीक पुराच्या पाण्याखाली सापडले असून, यापैकी २२ हजार हेक्टर ऊस  गुऱ्हाळघराकडे येतो. त्यामुळे आगामी हंगामात किमान सात लाख गूळ रव्यांचे (३० किलो) उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर  गुऱ्हाळघरांचीही पडझड झाली असून, जळणाच्या गंज्या (बडम्या) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हंगाम कसा सुरू करायचा, असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे.चिखली परिसरातील चिमण्या थंडावणारप्रयाग चिखली, वडणगे, वरणगे, निगवे दुमाला, पाडळी बुद्रुक परिसरांत सर्वाधिक  गुऱ्हाळघरे आहेत; पण महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त झाल्याने यंदा या भागातील  गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटण्याची शक्यता धूसर बनली आहे.उत्पादनाबरोबर प्रतीला फटकागुळाचे उत्पादन घटणार आहेच; त्याशिवाय पुरात सापडलेल्या उसामुळे गुळाची गोडी आणि रंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

पुराच्या पाण्याने ऊस कुजला आहे.  गुऱ्हाळघरांचे नुकसान झाल्याने हा उद्योग उभा राहणे अवघड आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी.- हिंदुराव तोडकर,गुऱ्हाळमालक, वाकरे

महापुरामुळे यंदा गुळाचे उत्पादन घटणार हे निश्चित आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आढावा घेऊन हंगामाची तयारी केली जाईल.- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर