शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचा तडाखा :गूळ हंगाम आला अडचणीत, गुऱ्हाळघरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:31 IST

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून  गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात  गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच  गुऱ्हाळमालकांसमोर आहे. यंदाच्या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे महापुराचा तडाखा :गूळ हंगाम आला अडचणीत, गुऱ्हाळघरांची पडझडऊस कुजल्याने २.१० लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून  गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात  गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच  गुऱ्हाळमालकांसमोर आहे. यंदाच्या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.‘कोल्हापुरी चप्पल’, ‘कोल्हापूर पद्धतीचा बंधारा’ याबरोबरच कोल्हापूरची आणखी ओळख म्हणजे ‘गूळ’ आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी येथे गुळाची बाजारपेठ वसविली आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिले. कोल्हापूरची माती आणि पाण्यामुळे येथील प्रत्येक शेतीमालाला वेगळी चव आहे. येथील कणीदार गुळाची चव काही औरच असते. त्यामुळे गुजरातसह देशातील अनेक बाजारपेठांत कोल्हापुरी गुळाला मागणी आहे.

काळाच्या ओघात साखर कारखाने उभे राहू लागल्याने  गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत गेली. गुळाचा अनिश्चित दर आणि साखर कारखान्यांमधील ऊसदराच्या स्पर्धेमुळे  गुऱ्हाळघरे मोडकळीस आली. सध्या जिल्ह्यात १५०-२००  गुऱ्हाळघरे सुरू आहेत.

यांपैकी सर्वाधिक  गुऱ्हाळघरे करवीर, पन्हाळा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत आहेत. वर्षाला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २५ लाख गूळ रव्यांची आवक होते. उसाची वाढलेल्या ‘एफआरपी’च्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक साखर कारखान्यांकडे वळले आहेत.यंदा अतिवृष्टी व महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा फटका बसला असून, त्यामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाजानुसार ७५ हजार हेक्टरांवरील ऊसपीक पुराच्या पाण्याखाली सापडले असून, यापैकी २२ हजार हेक्टर ऊस  गुऱ्हाळघराकडे येतो. त्यामुळे आगामी हंगामात किमान सात लाख गूळ रव्यांचे (३० किलो) उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर  गुऱ्हाळघरांचीही पडझड झाली असून, जळणाच्या गंज्या (बडम्या) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हंगाम कसा सुरू करायचा, असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे.चिखली परिसरातील चिमण्या थंडावणारप्रयाग चिखली, वडणगे, वरणगे, निगवे दुमाला, पाडळी बुद्रुक परिसरांत सर्वाधिक  गुऱ्हाळघरे आहेत; पण महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त झाल्याने यंदा या भागातील  गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटण्याची शक्यता धूसर बनली आहे.उत्पादनाबरोबर प्रतीला फटकागुळाचे उत्पादन घटणार आहेच; त्याशिवाय पुरात सापडलेल्या उसामुळे गुळाची गोडी आणि रंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

पुराच्या पाण्याने ऊस कुजला आहे.  गुऱ्हाळघरांचे नुकसान झाल्याने हा उद्योग उभा राहणे अवघड आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी.- हिंदुराव तोडकर,गुऱ्हाळमालक, वाकरे

महापुरामुळे यंदा गुळाचे उत्पादन घटणार हे निश्चित आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आढावा घेऊन हंगामाची तयारी केली जाईल.- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर