शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत बंदसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:24 IST

हुपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बाजारपेठेत सर्वत्र बंदसदृश स्थिती असल्याने हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील गावातील चांदी ...

हुपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बाजारपेठेत सर्वत्र बंदसदृश स्थिती असल्याने हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील गावातील चांदी उद्योगालाही याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच यापुढेही उद्भवणाऱ्या दीर्घकालीन मंदीच्या वातावरणालाही तोंड द्यावे लागणार आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी आणि अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती यामुळे सराफ बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी येथील चांदी व्यवसायातील संपूर्ण उलाढाल ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणात मंदीसदृश परिस्थिती उभी राहिलेली आहे.

गेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीच्या चक्रव्यूहात चांदी उद्योग तर सापडला आहेच, याबरोबरच नजीकच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगही बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे परिसरातील संपूर्ण आर्थिक चक्रच कोलमडून गेल्याने हजारो कुटुंबांवर एकाचवेळी बेरोजगार होण्याचे संकट उभे राहिले आहे. हुपरी परिसरात जवळपास ५००० उद्योजक आणि २५००० कारागीर या व्यवसायात कार्यरत आहेत. या व्यवसायातील दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यात तसेच परराज्यात दागिनेही घेऊन जाऊ शकत नाहीत अन्‌ परपेठेवरून कच्ची चांदीही आयात होऊ शकत नाही. अशा विचित्र संकटात येथील चांदी व्यवसाय सापडला गेला आहे. त्यामुळे यापुढील काही महिने येथील चांदी उद्योगात दीर्घकालीन मंदीचेच वातावरण राहणार यात काही शंकाच नाही. चांदी उद्योगातील पूरक व्यावसायिकांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने हुपरी व परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चौकट :

उद्योजक परिस्थितीवर मात करतील

येथील उद्योजक कल्पक आणि नावीन्याची आस असणारे आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नक्कीच नवीन सुरुवात करतील. असा विश्वास उद्योजक अमर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सरकारने लक्ष देण्याची गरज

चांदी उद्योजक मोहन खोत म्हणाले, हुपरी व परिसरातील चांदी उद्योजक, चांदी धडी उत्पादक व कारागीर, पूरक उद्योग संघटित कामगारांत मोडतात. हा हस्तकला उद्योग असल्यामुळे आणि यामध्ये लाखो लोक आपला उदरनिर्वाह करत असल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

----------::---------