शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

ग्रामपंचायतीत सत्तांतर, 'जलजीवन'मध्ये मतांतर; कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये

By समीर देशपांडे | Updated: February 14, 2023 17:07 IST

‘जलजीवन’ मिशनच्या वाहत्या गंगेत केवळ ठराविकजण हात धुऊन घेणार असतील तर त्यांच्यावर ग्रामस्थांनाच नजर ठेवावी लागणार

पुढच्या वर्षापर्यंत सर्व ग्रामीण भागातील जनतेला प्रतिमाणसी ५५ लिटर रोज पाणी देण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजना सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी योजनांची निविदा प्रक्रिया झाली असून यासाठी जिल्ह्यात १२०० काेटी रुपयांचा निधी येणार आहे. अशा या जलजीवन मिशनचा आढावा घेणारी मालिका आजपासून..समीर देशपांडेकोल्हापूर : सध्या गावागावात जलजीवन मिशन योजनेची चर्चा जोरात आहे. योजना किती लाखाची की कोटींची, ठेकेदार कोण याची माहिती घेतली जात आहे. अशातच अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्यामुळे तिथल्या जलजीवनबाबत तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे ‘जलजीवन’ मिशनच्या वाहत्या गंगेत केवळ ठराविकजण हात धुऊन घेणार असतील तर त्यांच्यावर ग्रामस्थांनाच नजर ठेवावी लागणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी या मिशनची घोषणा केली. २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला रोज प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले आहे. हे पाणी प्रत्येक घराला नळाव्दारेच दिले जाणार आहे. यासाठी दोन वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने काम सुरू करण्यात आले; परंतु पहिल्या वर्षी या कामाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही; मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धाेंगे यांनी मात्र यासाठी कंबर कसली आणि आज १३३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.मार्च २०२३ पर्यंत ज्या गावांची या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल अशा गावांनाच निधी मिळणार असल्यामुळे अनेक ठिकाणी जागा निश्चित नसतानाही योजना आखून त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्र सरकार निधी देणार आहे म्हटल्यावर अनेक ठिकाणी सध्याच्या योजना सुस्थितीत असतानाही आता नव्या योजनांचा घाट घातला गेला आहे; परंतु सरकार पैसे देत असेल तर तुमचे काय जातेय अशी विचारणा होत असल्याने अधिकाऱ्यांनीही या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे.पाच कोटी रुपयांच्या आतील योजना जिल्हा परिषदेच्या वतीने तर त्यावरील योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून राबवण्यात येणार आहेत; परंतु संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या जुन्या योजना बासनात गुंडाळून आता नव्या योजनेची कास धरली आहे. अनेक योजनांची अंदाजपत्रके गावपुढाऱ्यांनी वाढवून घेतली असून त्यामध्ये आमदार,खासदारांनाही मध्यस्थी घालून योजना घसघशीत कशी होईल याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे आता गावागावातील विरोधी गट आणि ग्रामस्थ यांनीच या योजना दर्जेदार कशा होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्हा - प्रशासकीय मान्यता - कामे सुरू - कामे पूर्ण - येणारा निधीकोल्हापूर -१२३५ -१०३० -१३३ - १२०० कोटी रूपये

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आघाडीवर राहिला आहे. बहुतांशी योजनांची कामे सुरू झाली असून ती दर्जेदार आणि वेळेत कशी पूर्ण होतील याकडे आता लक्ष दिले जात आहे. - संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी