शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र पालटणार : चंद्रकांतदादा पाटील

By admin | Updated: July 16, 2017 18:59 IST

आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रणाली कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १५ : शेतीचे उत्पादन वाढून जोपर्यंत उत्पन्नात वाढ होत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. यासाठी जिल्ह्यातील शेतीचे चित्र बदलून येथील शेतीविकास देशात अधोरेखित व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे केले. जैन इरिगेशनने विकसित केलेली आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रणाली कागलमध्ये १५० एकरांवर राबविण्यात येणार असून, राज्य आणि देशासाठी हा प्रयोग मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

 

ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लब येथे शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या विविध विषयांवर सादरीकरण व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, कणेरी मठाचे स्वामी अदृश काडसिद्धेश्वर, मुपिन काडसिद्धेश्वर, जैन इरिगेशनचे अभय जैन, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, केळी पीकतज्ज्ञ के. बी. पाटील, अभिजित जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन भरघोस वाढविता येणे शक्य आहे. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. जैन इरिगेशनकडील आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रणालीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र पालटण्यासाठी उपलब्ध जमिनीवर उत्पादन दुप्पट व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. यापुढे कृषी विभागाच्या यंत्रणांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. अभय जैन म्हणाले, बंदिस्त पाईपलाईनद्वारेच पाणी उपसा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपसा पद्धतीमुळे पाणी वाया जाणार नाही व पाट पद्धतीने लागणाऱ्या पाण्यापेक्षा कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल. के. बी. पाटील म्हणाले, उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर शेतीला विज्ञान समजून काम केले पाहिजे. पिकांच्या आवश्यकतेनुसार आणि वेळेनुसार पिकाचे व्यवस्थापन केले तर उत्पादन दुपटीचे स्वप्न निश्चित पूर्ण करणे शक्य आहे. तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कृषिक्षेत्रही याला अपवाद नाही. अभिजित जोशी यांनी उपसा ठिबक सिंचन जैन इरिगेशनची एकात्मिक प्रणाली, आॅटोमेटिक इरिगेशन यंत्रणा याबाबत सादरीकरण केले. यावेळी ‘गुरुदत्त शुगर्स’चे माधवराव घाटगे, अनिल यादव, प्रताप कोंडेकर यांच्यासह प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.

कागल तालुक्यात राज्यातील पहिला ठिबक प्रकल्प

 

उत्पादन वाढले की शेतकरी श्रीमंत होतो. त्यासाठी शेतकऱ्यांचे समूह करण्यात येतील. याचीच सुरुवात समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदशर्नाखाली कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा गट करून १५० एकरांवर महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा ग्रुप आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात किमान असे २५ समूह तयार करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

कृषी अधीक्षकांना पालकमंत्र्यांचा डोस

 

पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा कृषी विभागाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तुम्ही काय केलेत? कृषी विभाग म्हणून तुमची काय जबाबदारी आहे की नाही? अशी विचारणा करीत, मी कृषिमंत्री नसल्याने मला रिपोर्टिंग करत नाही का? अशी विचारणा करीत मी कृषिमंत्री नसलो तरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, हे दाखवावे लागेल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी जिल्हा कृृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांना डोस दिला. तसेच दर महिन्याला कृषी विभागाची आढावा बैठक घ्या, अशी सूचनाही केली.

 

‘ठिबक’ला उत्तेजन देण्यासाठी कंपन्यांकडून निधी घेणार

 

ठिबकच्या माध्यमातून खते आणि कीटकनाशकेही देता येतात. त्यामुळे विजेशिवाय चालणारी ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी उपकारक आहे. ठिबक प्रणालीला उत्तेजन देण्यासाठी ती एकरी ५० हजार रुपये खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी उद्योग जगतातील मोठमोठ्या कंपन्यांचा ‘सीएसआर’ मिळविण्यात येईल. कंपन्यांकडून दोन टक्के खर्च हा सामाजिक कामांवर केला जातो, त्याचा उपयोग या ठिकाणी होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

शेतीप्रगतीशिवाय देशाचा विकास दर वाढणार नाही

 

शेतीतील उत्पादनवाढीसाठी विविध प्रयोग जिल्ह्यात करण्यात येत असून धारवाड, मालेगाव, खानापूर या ठिकाणी नैसर्गिक कीटकनाशकांचा प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत आहेत, असे सांगून शेतीत प्रगती झाल्याशिवाय देशाचा विकासदर वाढणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

रामथल येथे २५ हेक्टरवर ठिबकचा प्रकल्प

 

कर्नाटकातील रामथल येथे २५ हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविण्यात येत असून, ही कोरडवाहू शेती आता बागायती झाली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातही काम करता येणे शक्य आहे, असे जैन यांनी सांगितले.

 

शेती उद्योगाला प्रक्रिया उद्योगाची जोड द्यावी

 

शेती उद्योगाला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याची आवश्यकता के. बी. पाटील यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर टिशू कल्चर केळी, टिशू कल्चर डाळिंब, अल्ट्राहाय डेन्सीपी हंबा, पेरू, ऊस, आदी पिकांबाबत माहिती देऊन हवामानातील बदल, तापमानवाढ, पाणी, जमिनीची सुपीकता, अन्नघटकांची उपलब्धता यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.