शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जयभीमनगरमधील लाभार्थ्यांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : गेल्या बारा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही जयभीमनगरमधील १०८ घरकुलांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : गेल्या बारा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही जयभीमनगरमधील १०८ घरकुलांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी बुधवारी नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या दालनात ठिय्या मारला. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा लाभार्थ्यांनी घेतला. यावेळी नगराध्यक्षांनी शासनाकडून आलेल्या निधीच्या व्याजातून योजनेच्या बांधकामासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याने लाभार्थी शांत झाले.

नगरपालिकेजवळ असलेल्या जयभीमनगर झोपडपट्टीमध्ये शासनाच्या योजनेतून ७२० घरकुले बांधण्यात येणार होती. परंतु, अनेकवेळा मागणी करूनही १२ वर्षांपासून १०८ लाभार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित असून, संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेतली. अनेक वर्षे झाली केवळ आश्वासने देण्यात आली. अजून किती सहन करायचे? किती दिवस भाड्याच्या घरात राहायचे, असा सवाल उपस्थित करत तातडीने घरकुल बांधकाम सुरू करण्याची मागणी केली. येत्या चार ते पाच दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक करून या विषयावर मार्ग काढण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. राज्य शासनाकडून घरकुलाच्या बांधकामासाठी आलेल्या निधीतील चार कोटी ५२ लाख रुपये व्याज शिल्लक असून, त्याचा विनियोग बांधकामासाठी करण्याची मागणी मुख्याधिकारी ठेंगल यांच्याकडे केली. मात्र, त्याला शासनाची मंजुरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून लाभार्थ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा नगराध्यक्षांची भेट घेतली. यावेळी नगर अभियंता संजय बागडे यांनी रमाई योजनेतून घरकुलाचा प्रस्ताव देत जातीच्या दाखल्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, लाभार्थ्यांनी त्यास नकार दिला.

फोटो ओळी

२२०९२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत जयभीमनगरमधील लाभार्थ्यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला.