शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारीवरून आंदोलन पेटणार

By admin | Updated: October 15, 2015 00:44 IST

चिपरी, तमदलगेसह सात गावांचा समावेश : जयसिंगपुरात आज आंदोलनाची दिशा ठरणार

जयसिंगपूर : जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती व हरोली या सात गावांत चुकीच्या पद्धतीने आणेवारी करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. यामुळे आणेवारीवरून आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेर सर्वेक्षण करून आणेवारी कमी करावी, या मागणीसाठी सात गावांतील प्रतिनिधींची आज, गुरुवारी जयसिंगपूर येथे बैठक होणार आहे. याबैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाळून गेली असून, शेतकरी आर्थिक आरिष्ठात सापडला आहे. सात गावांत सरासरीपेक्षा कमी पाऊस कायमच पडतो. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी न करताच आणेवारी वाढवून लावली आहे. त्यामुळे योग्य पंचनामे होऊन येथील नागरिकांना शासकीय लाभ मिळावा. याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा तहसीलदार सचिन गिरी यांना २५ सप्टेंबरला निवेदनद्वारे देण्यात आला होता.जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, हरोली व धरणगुत्ती ही सात गांवे टंचाईग्रस्त असून, याठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी पावसाळा कोरडाच गेल्यामुळे खरीप हंगामात पेरणी झालेली पिके पूर्णत: वाळून गेली आहेत. तसेच येथील जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सात गावांची आणेवारी चुकीची झाली असून, सध्या ७१ टक्के नजर पैसेवारी दाखविली आहे. सदरची नजर पैसे आणेवारी फेर तपासणी करण्यात यावी. येथील गावातील आणेवारी ही ५० टक्यांहून कमी असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणेवारी निश्चित करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सात गावांतील प्रतिनिधींची गुरुवारी जयसिंगपूर येथे बैठक होणार असून, या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. एकूणच आणेवारीवरून गावातील वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती व हरोली या सात गावांत चुकीच्या पद्धतीने आणेवारी झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप फेर सर्वेक्षण करून आणेवारी कमी करण्याची मागणीही गावे टंचाईग्रस्त असून, याठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. पावसाळा कोरडाच गेल्यामुळे पेरणी झालेली पिके वाळली आहेत.