शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एका तासात नेमकं काय घडलं? बार आणि रेस्टॉरंटवर पालिका प्रशासन मेहेरबान का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 23:27 IST

केडीएमसी प्रशासनाने बार आणि हॉटेल सुरू ठेवण्यास रात्री 11 वाजेपर्यंत वाढीव मुदत दिली.या निर्णयामुळे सध्या व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Kalyan Dombivali Municipal corporation)

कल्यान - बुधवारी कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत तबल 392 कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी साधारणपणे साडे सहा वाजण्याच्या सुमारास  माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बार  हॉटेल्स- रेस्टॉरंट रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील असेही त्यांनी नमुद केले होते. (What exactly happened in an hour? Why is the municipal administration kind to bars and restaurants?)

मात्र एक तासाच्या कालावधीनंतर  महापालिकेने  कोलांटीउडी घेत बार आणि हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंत नाही तर रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या एका तासात नेमकं काय घडलं? पालिकेने आपला निर्णय का बदलला? पालिका प्रशासन हॉटेल आणि बार वर मेहेरबान का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

त्यातच शनिवारी आणि रविवारी p1 pe नुसार  दुकानं सुरू राहतील असे आदेशही पालिकेने दिले आहेत. त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे. असे असताना बार आणि हॉटेल्स बाबत मात्र वेगळा निर्णय घेतला जातो. हातगाडीलासुद्धा सायंकाळी 7 तर  पोळीभाजी केंद्राला सुद्धा रात्री 9 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. हे सर्व एकीकडे असताना फक्त बार आणि हॉटेल बाबत वेगळा निर्णय घेतला जात आहे. 

कोरोनां फक्त आमच्याच दुकानातून पसरतो का? बार आणि रेस्टॉरंटमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही का? आमच्या बाबतीतच दुजाभाव का, अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार कल्याणडोंबिवलीतील व्यापारी करू लागलेत. झाले असे की , केडीएमसी प्रशासनाने बार आणि हॉटेल सुरू ठेवण्यास रात्री 11 वाजेपर्यंत वाढीव मुदत दिली.या निर्णयामुळे सध्या व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर ठिकाणी ज्याप्रमाणे नियम सर्वांसाठी सारखे लागू करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे केडीएमसीनेही सर्वांना सारखे नियम लागू करावेत. आम्ही केडीएमसीच्या सोबत आहोत मात्र आमच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याच्या भावना व्यापारी व्यक्त करत आहेत.  

त्यामुळे येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केडीएमसीकडून काही वेगळा निर्णय घेण्यात येतो का तसेच व्यपाऱ्यांच्या प्रतिनिधींशी पालिका प्रशासन चर्चा करून काही तोडगा काढते का ? हे पाहणे महत्वाचे आहे. त्यासोबतच नियम मोडल्यावर ज्याप्रमाणे  फेरीवाले, सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यावर कारवाई केली जाते तशी  बेधडक कारवाई  या हॉटेल्स आणि बारवर देखील केली जाते का ते येणाऱ्या दिवसात समजेल. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवली