शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आगरी-कोळी भवनाचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन; मनसे आमदार राजू पाटील यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 12:44 AM

आगरी साहित्यिकांनी घेतली भेट, या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली. 

ठाणे / कल्याण : महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आपण सोबत प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन येत्या १९ डिसेंबर रोजी ते डोंबिवली येथील ‘आगरी-कोळी आणि वारकरी’ भवनाचे भूमिपूजन करणार असल्याचे तसेच त्यात १०० टक्के आगरी-कोळी बोली आणि तिचे साहित्य जतन संवर्धनासाठी प्रयत्न करू, असेही आश्वासन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आगरी साहित्यिकांना दिले.

ठाण्याची मूळ बोली आगरी-कोळी भाषा आणि तिचे साहित्य जतन-संवर्धनात पुढाकार घेत असलेले युवा साहित्यिक सर्वेश तरे, चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील, गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसेचे आ. राजू पाटील यांना आगरी-कोळी बोलीला राजाश्रय मिळावा, यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली. 

त्यांनी म्हटले आहे की, आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, आगरी-कोळी बोलीतील साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून शिबिरे राबविणे, बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्तरीय संशोधन केंद्रे निर्माण करणे, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आगरी-कोळी भाषा आणि तिचे दुर्मीळ साहित्य ‘ग्लोबल’ करणे, सोबतच महाराष्ट्र राज्य सरकारचे २०१४ चे भाषाविषयक धोरण बोलीभाषेचे संवर्धन करणे, लोकगीत, लोककला, लोककथा संकलन-प्रसिद्ध करणे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी बोलींचे शब्दकोश तयार करणे, बोलींचा अभ्यास, संकलन आणि संशोधन करण्यासाठी यंत्रणा उभारावी, या मागण्या केल्या.

टॅग्स :MNSमनसे