शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 15:29 IST

शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. 

(Image Credit : The Better India)

आज शेती करण्यात सर्वात मोठी अडचण दुष्काळ आणि कर्जामुळे येते. महाराष्ट्रातील एक गाव आहे धामणगाव. येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. स्थानिक नद्या कोरड्या पडल्या होत्या, पाऊस होत नव्हता. २०१६ ची घटना आहे. शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. 

गावातील तरूण बनला जॉइंट कमिश्नर

जमिनीत पाण्यात कमतरता आणि दुष्काळ या समस्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य लोकही प्रभावित झाले. याचदरम्यान मुंबईतील इन्कम टॅक्स विभागाचे जॉइंट कमिश्नर डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी जेव्हा ही दुर्दशा पाहिली तर ते शॉक्ड  झाले. ते याच गावातील आहेत. अशात त्यांनी  आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. 

द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या समस्येबाबत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आधी त्यांनी एक जल संरक्षण योजना लॉन्च केली. याने नद्या आणि भूजल स्थिती ठिक करण्याचं ठरवलं. नंतर छोटे बांध आणि जल संरक्षणासाठी खोदकाम केलं. या प्रयत्नातून २२ कोटी लीटर पाणी जमा होऊ शकतं. या परिसरातील पाण्याची समस्या दूर झाली.

इतरही गावात केला सुधार

हेच मॉडल त्यांनी इतर १६ गावांमध्ये लॉन्च केलं. ज्यामुळे अनेक गावे ३ वर्षांच्या आत दुष्काळातून बाहेर पडलीत. ते स्वत: एका शेतकरी कुटूंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. आई शिक्षिका आहेत. शेतीच्या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत. त्यांनी UPSC जमिनीत बदल करण्यासाठीच जॉइन केली होती.

डॉ. चव्हाण म्हणाले की, '३० वर्षांआधी कोणत्याही पोकलेन मशीनी नव्हता. त्यामुळे लोकांनी नुकसानाच्या सीमेची परवा न करता विहिरी मॅन्युअल पद्धतीने खोदण्यात आल्या. विहिरींची खोली ७० फूट झाली. त्यामुळे पाण्याची समस्या वाढली. शेतकरी आधी केवळ पावसाळ्यात शेती करत होते. वर्षभर दुसरं उत्पन्न नव्हतं. त्यामुळे लोक शहराकडे जाऊ लागले. गावात केवळ वयोवृद्ध राहिलेत. आर्थिक चक्र सीमित झालं. आमच्याकडे काहीच सेव्हिंग नव्हतं. त्यामुळे काही समजायच्या आत आम्ही एका चक्रव्यूहात अडकलो होतो'.

या कामात गावातील लोकांनीही त्यांची खूप मदत केली. काही एनजीओ समोर आल्यात. गावातील लोकांनी १ हजार रूपयांपासून आर्थिक मदत केली. ज्यांना जी जमेल ती मदत केली आणि आज गावातील पाण्याची समस्या दूर झाली. इथला शेतकरी सुखावला आहे. आज याचा फायदा ३० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र