शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 15:29 IST

शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. 

(Image Credit : The Better India)

आज शेती करण्यात सर्वात मोठी अडचण दुष्काळ आणि कर्जामुळे येते. महाराष्ट्रातील एक गाव आहे धामणगाव. येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. स्थानिक नद्या कोरड्या पडल्या होत्या, पाऊस होत नव्हता. २०१६ ची घटना आहे. शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. 

गावातील तरूण बनला जॉइंट कमिश्नर

जमिनीत पाण्यात कमतरता आणि दुष्काळ या समस्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य लोकही प्रभावित झाले. याचदरम्यान मुंबईतील इन्कम टॅक्स विभागाचे जॉइंट कमिश्नर डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी जेव्हा ही दुर्दशा पाहिली तर ते शॉक्ड  झाले. ते याच गावातील आहेत. अशात त्यांनी  आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. 

द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या समस्येबाबत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आधी त्यांनी एक जल संरक्षण योजना लॉन्च केली. याने नद्या आणि भूजल स्थिती ठिक करण्याचं ठरवलं. नंतर छोटे बांध आणि जल संरक्षणासाठी खोदकाम केलं. या प्रयत्नातून २२ कोटी लीटर पाणी जमा होऊ शकतं. या परिसरातील पाण्याची समस्या दूर झाली.

इतरही गावात केला सुधार

हेच मॉडल त्यांनी इतर १६ गावांमध्ये लॉन्च केलं. ज्यामुळे अनेक गावे ३ वर्षांच्या आत दुष्काळातून बाहेर पडलीत. ते स्वत: एका शेतकरी कुटूंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. आई शिक्षिका आहेत. शेतीच्या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत. त्यांनी UPSC जमिनीत बदल करण्यासाठीच जॉइन केली होती.

डॉ. चव्हाण म्हणाले की, '३० वर्षांआधी कोणत्याही पोकलेन मशीनी नव्हता. त्यामुळे लोकांनी नुकसानाच्या सीमेची परवा न करता विहिरी मॅन्युअल पद्धतीने खोदण्यात आल्या. विहिरींची खोली ७० फूट झाली. त्यामुळे पाण्याची समस्या वाढली. शेतकरी आधी केवळ पावसाळ्यात शेती करत होते. वर्षभर दुसरं उत्पन्न नव्हतं. त्यामुळे लोक शहराकडे जाऊ लागले. गावात केवळ वयोवृद्ध राहिलेत. आर्थिक चक्र सीमित झालं. आमच्याकडे काहीच सेव्हिंग नव्हतं. त्यामुळे काही समजायच्या आत आम्ही एका चक्रव्यूहात अडकलो होतो'.

या कामात गावातील लोकांनीही त्यांची खूप मदत केली. काही एनजीओ समोर आल्यात. गावातील लोकांनी १ हजार रूपयांपासून आर्थिक मदत केली. ज्यांना जी जमेल ती मदत केली आणि आज गावातील पाण्याची समस्या दूर झाली. इथला शेतकरी सुखावला आहे. आज याचा फायदा ३० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र