शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

नवरदेवाशिवायच नवरीचं लावून देतात इथे लग्न, नवरदेव तिची वाट बघत बसलेला असतो घरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 16:18 IST

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव.

(Image Credit :weddingsonline India)

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव. सामान्यपणे नवरदेव वरात घेऊ नवरीच्या घरी जातो. वेगवेगळे रिवाज करून दोघेही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. नवरदेव नवरीला आपल्या घरी घेऊन येतो. प्रत्येक लग्नाची साधारण अशी कहाणी असते. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कहाणी या लग्नांपेक्षा वेगळी आहे.

गुजरातच्या छोटा उदयपुरमध्ये लग्ने इतर ठिकाणी होतात तशीच सामान्यपणे होतात. पण येथील सुरखेडा, अंबाला आणि सनाडा या तीन गावांमध्ये राहणारे राठवा समाजातील लग्नांमधून नवरदेव गायब असतो. होय. इथे नवरदेवाशिवायच लग्न लागतं. ही बाब भलेही आश्चर्यकारक आहे. पण ही येथील परंपरा आहे.

मुलीचं मुलीशी लग्न

इथे नवरीला आणण्यासाठी नवरदेव जात नाही. तो त्याच्या घरी नवरीची वाट बघत बसलेला असतो. नवरदेवाच्या जागी त्याची अविवाहित बहीण घोडीवर बसते आणि वरात घेऊन नवरीच्या घरी जाते. नवदेवाची बहिणच नवरदेवासारखी श्रृंगार करते. इतर लग्नांमध्ये होतात त्या सर्व गोष्टी या लग्नात होता. नवरी तिच्या नणंदेला हार घालते आणि नणंद तिच्या वहिणीला. इतकेच नाही तर दोघी सप्तपदीही घेतात. आणि नवरीला घरी घेऊन जातात.

काय आहे मान्यता

या समाजातील लोकांचं म्हणणं आहे की, ही परंपरा गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. असे म्हटले जाते की, या गावातील देव अविवाहित आहेत. त्यामुळे कोणताही मुलगा लग्न करू शकत नाही. या गावातील देव अविवाहित देवांची परंपरा पाळतात. इथे कोणताही मुलगा लग्नासाठी नवरीच्या घरी जात नाही. जर नवरदेव घोडीवर बसून मंडपात गेला तर अशुभ मानलं जातं. असे म्हणतात की, ही परंपरा मोडली तर देव नाराज होतात, ज्यामुळे नवरदेवाला नुकसान पोहोचू शकतं. तसेच त्यांचा वंशही पुढे वाढत नाही.

बहीण का जाते?

या गावात अशीही मान्यता आहे की, अविवाहित बहीण भावासाठी कवचासारखी असेत, जी त्याला वाईट नजरेपासून वाचवते. बहिणीला भावाची रक्षक मानलं जातं. ती नव्या जीवनात प्रवेश करणाऱ्या भावाची मदत करते.

सासुरवाडीला जाऊन पुन्हा होतं लग्न

नवरीच्या घरी होणाऱ्या लग्नात नवरदेवाची बहीण डोक्यावर टोपली ठेवून लग्नाच्या सर्व विधी पार पाडते आणि वहिणीला घरी घेऊन येते. ती नवरीला नवरदेवाकडे सुपूर्द करते आणि तिची जबाबदारी संपते. सासुरवाडीला आल्यावर नवरीला नवरदेवासोबत पुन्हा सगळ्या विधीनुसार लग्न करावं लागतं. असे म्हणतात की, नवरदेवाची बहीण अविवाहित असणं गरजेचं आहे. जर त्याला सख्खी बहीण नसेल तर त्याची चुलत बहीण, मामे बहीणही या विधी करू शकते.

मुलीकडील लोकांना द्यावा लागत नाही हुंडा

या अनोख्या लग्नाची एक आणखी खास बाब म्हणजे इथे नवरीच्या घरातील लोकांना हुंडा द्यावा लागत नाही. उलट नवरी आणण्यासाठी नवरदेवाकडील लोकच नवरीकडील लोकांना हुंडा देतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGujaratगुजरातmarriageलग्न