शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नवरदेवाशिवायच नवरीचं लावून देतात इथे लग्न, नवरदेव तिची वाट बघत बसलेला असतो घरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 16:18 IST

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव.

(Image Credit :weddingsonline India)

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव. सामान्यपणे नवरदेव वरात घेऊ नवरीच्या घरी जातो. वेगवेगळे रिवाज करून दोघेही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. नवरदेव नवरीला आपल्या घरी घेऊन येतो. प्रत्येक लग्नाची साधारण अशी कहाणी असते. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कहाणी या लग्नांपेक्षा वेगळी आहे.

गुजरातच्या छोटा उदयपुरमध्ये लग्ने इतर ठिकाणी होतात तशीच सामान्यपणे होतात. पण येथील सुरखेडा, अंबाला आणि सनाडा या तीन गावांमध्ये राहणारे राठवा समाजातील लग्नांमधून नवरदेव गायब असतो. होय. इथे नवरदेवाशिवायच लग्न लागतं. ही बाब भलेही आश्चर्यकारक आहे. पण ही येथील परंपरा आहे.

मुलीचं मुलीशी लग्न

इथे नवरीला आणण्यासाठी नवरदेव जात नाही. तो त्याच्या घरी नवरीची वाट बघत बसलेला असतो. नवरदेवाच्या जागी त्याची अविवाहित बहीण घोडीवर बसते आणि वरात घेऊन नवरीच्या घरी जाते. नवदेवाची बहिणच नवरदेवासारखी श्रृंगार करते. इतर लग्नांमध्ये होतात त्या सर्व गोष्टी या लग्नात होता. नवरी तिच्या नणंदेला हार घालते आणि नणंद तिच्या वहिणीला. इतकेच नाही तर दोघी सप्तपदीही घेतात. आणि नवरीला घरी घेऊन जातात.

काय आहे मान्यता

या समाजातील लोकांचं म्हणणं आहे की, ही परंपरा गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. असे म्हटले जाते की, या गावातील देव अविवाहित आहेत. त्यामुळे कोणताही मुलगा लग्न करू शकत नाही. या गावातील देव अविवाहित देवांची परंपरा पाळतात. इथे कोणताही मुलगा लग्नासाठी नवरीच्या घरी जात नाही. जर नवरदेव घोडीवर बसून मंडपात गेला तर अशुभ मानलं जातं. असे म्हणतात की, ही परंपरा मोडली तर देव नाराज होतात, ज्यामुळे नवरदेवाला नुकसान पोहोचू शकतं. तसेच त्यांचा वंशही पुढे वाढत नाही.

बहीण का जाते?

या गावात अशीही मान्यता आहे की, अविवाहित बहीण भावासाठी कवचासारखी असेत, जी त्याला वाईट नजरेपासून वाचवते. बहिणीला भावाची रक्षक मानलं जातं. ती नव्या जीवनात प्रवेश करणाऱ्या भावाची मदत करते.

सासुरवाडीला जाऊन पुन्हा होतं लग्न

नवरीच्या घरी होणाऱ्या लग्नात नवरदेवाची बहीण डोक्यावर टोपली ठेवून लग्नाच्या सर्व विधी पार पाडते आणि वहिणीला घरी घेऊन येते. ती नवरीला नवरदेवाकडे सुपूर्द करते आणि तिची जबाबदारी संपते. सासुरवाडीला आल्यावर नवरीला नवरदेवासोबत पुन्हा सगळ्या विधीनुसार लग्न करावं लागतं. असे म्हणतात की, नवरदेवाची बहीण अविवाहित असणं गरजेचं आहे. जर त्याला सख्खी बहीण नसेल तर त्याची चुलत बहीण, मामे बहीणही या विधी करू शकते.

मुलीकडील लोकांना द्यावा लागत नाही हुंडा

या अनोख्या लग्नाची एक आणखी खास बाब म्हणजे इथे नवरीच्या घरातील लोकांना हुंडा द्यावा लागत नाही. उलट नवरी आणण्यासाठी नवरदेवाकडील लोकच नवरीकडील लोकांना हुंडा देतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGujaratगुजरातmarriageलग्न