शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

नवरदेवाशिवायच नवरीचं लावून देतात इथे लग्न, नवरदेव तिची वाट बघत बसलेला असतो घरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 16:18 IST

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव.

(Image Credit :weddingsonline India)

भलेही प्रत्येक धर्म आणि जातींमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज राहत असतील, पण एक बाब समान असते. ती म्हणजे नवरी आणि नवरदेव. सामान्यपणे नवरदेव वरात घेऊ नवरीच्या घरी जातो. वेगवेगळे रिवाज करून दोघेही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. नवरदेव नवरीला आपल्या घरी घेऊन येतो. प्रत्येक लग्नाची साधारण अशी कहाणी असते. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कहाणी या लग्नांपेक्षा वेगळी आहे.

गुजरातच्या छोटा उदयपुरमध्ये लग्ने इतर ठिकाणी होतात तशीच सामान्यपणे होतात. पण येथील सुरखेडा, अंबाला आणि सनाडा या तीन गावांमध्ये राहणारे राठवा समाजातील लग्नांमधून नवरदेव गायब असतो. होय. इथे नवरदेवाशिवायच लग्न लागतं. ही बाब भलेही आश्चर्यकारक आहे. पण ही येथील परंपरा आहे.

मुलीचं मुलीशी लग्न

इथे नवरीला आणण्यासाठी नवरदेव जात नाही. तो त्याच्या घरी नवरीची वाट बघत बसलेला असतो. नवरदेवाच्या जागी त्याची अविवाहित बहीण घोडीवर बसते आणि वरात घेऊन नवरीच्या घरी जाते. नवदेवाची बहिणच नवरदेवासारखी श्रृंगार करते. इतर लग्नांमध्ये होतात त्या सर्व गोष्टी या लग्नात होता. नवरी तिच्या नणंदेला हार घालते आणि नणंद तिच्या वहिणीला. इतकेच नाही तर दोघी सप्तपदीही घेतात. आणि नवरीला घरी घेऊन जातात.

काय आहे मान्यता

या समाजातील लोकांचं म्हणणं आहे की, ही परंपरा गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. असे म्हटले जाते की, या गावातील देव अविवाहित आहेत. त्यामुळे कोणताही मुलगा लग्न करू शकत नाही. या गावातील देव अविवाहित देवांची परंपरा पाळतात. इथे कोणताही मुलगा लग्नासाठी नवरीच्या घरी जात नाही. जर नवरदेव घोडीवर बसून मंडपात गेला तर अशुभ मानलं जातं. असे म्हणतात की, ही परंपरा मोडली तर देव नाराज होतात, ज्यामुळे नवरदेवाला नुकसान पोहोचू शकतं. तसेच त्यांचा वंशही पुढे वाढत नाही.

बहीण का जाते?

या गावात अशीही मान्यता आहे की, अविवाहित बहीण भावासाठी कवचासारखी असेत, जी त्याला वाईट नजरेपासून वाचवते. बहिणीला भावाची रक्षक मानलं जातं. ती नव्या जीवनात प्रवेश करणाऱ्या भावाची मदत करते.

सासुरवाडीला जाऊन पुन्हा होतं लग्न

नवरीच्या घरी होणाऱ्या लग्नात नवरदेवाची बहीण डोक्यावर टोपली ठेवून लग्नाच्या सर्व विधी पार पाडते आणि वहिणीला घरी घेऊन येते. ती नवरीला नवरदेवाकडे सुपूर्द करते आणि तिची जबाबदारी संपते. सासुरवाडीला आल्यावर नवरीला नवरदेवासोबत पुन्हा सगळ्या विधीनुसार लग्न करावं लागतं. असे म्हणतात की, नवरदेवाची बहीण अविवाहित असणं गरजेचं आहे. जर त्याला सख्खी बहीण नसेल तर त्याची चुलत बहीण, मामे बहीणही या विधी करू शकते.

मुलीकडील लोकांना द्यावा लागत नाही हुंडा

या अनोख्या लग्नाची एक आणखी खास बाब म्हणजे इथे नवरीच्या घरातील लोकांना हुंडा द्यावा लागत नाही. उलट नवरी आणण्यासाठी नवरदेवाकडील लोकच नवरीकडील लोकांना हुंडा देतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGujaratगुजरातmarriageलग्न