शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला भर पावसाळ्यात सहाव्या दिवशी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST

नशिराबाद : येथील व परिसरातील धरणे, नाले तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना नियोजनाअभावी अजूनही सहाव्या, सातव्या दिवशी पाणीपुरवठा ...

नशिराबाद : येथील व परिसरातील धरणे, नाले तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना नियोजनाअभावी अजूनही सहाव्या, सातव्या दिवशी पाणीपुरवठा गावात होत आहे. त्यातच १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही शुद्ध पाणी देण्यात असमर्थ ठरली आहे. शुद्ध पाण्यासाठीची बोंबाबोंब कायम आहे. गावासाठी नवीन पाणीयोजना तयार करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपूर्वी गतिमान झाल्या होत्या. मात्र, त्याचे काम थंडबस्त्यात आहे. धरणे उशाला असली तरी कोरड मात्र घशाला कायम आहे, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.

येथे पाणीटंचाईचा सामना नवीन नाही. दरवर्षी येथे पाणीसमस्या कायम आहे. कधी जलवाहिनी फुटते, वीजपंप नादुरुस्त, विहिरींची भूजल पातळी खालावणे, विजेचा लपंडाव वीजपुरवठा खंडित आदी कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. वाघुर, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्रोतांवर गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाणीसमस्या नशिराबादकरांच्या नशिबी कायमच आहे. पाणीसमस्येवर मात करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. त्यात कायमस्वरूपी पाणीयोजनेवर मात करण्यासाठी सोळा कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वित करण्यात आली, मात्र ती शुद्ध पाणीपुरवठा करण्यात असमर्थ ठरल्याने सर्वत्र फज्जा उडाला आहे. सध्या परिसरात धरणे, नाले, नदी तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा गावात होत आहे. गावात पाणीपुरवठ्याचे टप्पे मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी, विजेचा लपंडाव वाढल्यामुळे जलकुंभ भरण्यास उशीर होत असल्यामुळे काही भागात सातव्या दिवशी पाणीपुरवठा झाला, असे सांगितले जात आहे.

इन्फो

योजनेच्या व्हायरसवर चर्चेला उधाण

नशिराबादच्या पाणीयोजनेबाबत एका ग्रुपवर चांगलाच ऊहापोह झाला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आपापली मते प्रदर्शित करून योजनेचे महत्त्व पटवून दिले. मात्र, ही योजना शेळगावऐवजी वाघुर येथून घेतली असती, तर यशस्वी ठरली असती, अशा या बाबतीत चर्चा रंगल्या. या सर्व चर्चांमुळे नशिराबादच्या पाण्याला राजकीय बुडबुडे आले आहे, हे मात्र तितकेच खरे... गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे व पुन्हा ग्रामविकासासाठी निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.