शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला पुन्हा चुलीवर, गॅस सिलिंडर कसे भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : गाजावाजा करून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना स्वयंपाकाचा मोफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : गाजावाजा करून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना स्वयंपाकाचा मोफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. अनुदानही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

‘बजेट’ कोलमडतेय स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्पउत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागत आहे. महागाईत गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. सध्या सिलिंडर ८६५ रुपयांना मिळत असून, अनुदान बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

गॅस सिलिंडर दरात झालेली वाढ

जानेवारी २०१९ -६९२

जानेवारी २०२० - ७१४.५०

जानेवारी २०२१ - ६९९

ऑगस्ट २०२१ - ८६४.५०

अत्यल्प मिळते अनुदान

गॅस सिलिंडरवर आधी २०० ते २५० रुपये अनुदान मिळत होते. त्यामुळे, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढलेले असताना केवळ २ ते ३ रुपये खात्यात जमा होत आहे. या अनुदानासाठी ग्राहकांना बँकेचे खाते काढावे लागत आहे. त्यासाठी बँकेत काही रक्कम डिपॉझिट ठेवावी लागते. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे.

- उज्ज्वला पाटील, गृहिणी, भुसावळ

सिलिंडरचे भाव १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे अनुदान मात्र नसल्यासारखेच झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे. तसेच अनुदान वाढविण्याची गरज आहे.

-कल्पना चौधरी, गृहिणी, भुसावळ

कोरोनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. गॅसचे भावही दुपटीने वाढले असून, मिळणारे अनुदानही बंदच झाले आहे. त्यामुळे सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे.

- अश्विनी विनय परदेशी, गृहिणी, भुसावळ