शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून पुलामुळे त्रस्त असलेल्या शिवाजीनगरवासीयांना रस्त्यांनीही केले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिक गेल्या अडीच वर्षांपासून पुलाचे काम रखडले असल्याने, काही किमीचा फेरा मारून शहरात येत आहेत. हा त्रास कमी होता की काय, त्यात शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे शिवाजीनगरवासीयांची वाट अजून बिकट झाली आहे. ही समस्या ना मनपा प्रशासन सोडायला तयार आहे, ना लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, मोटारसायकल चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.

शिवाजीनगर भाग हा शहरातील महत्त्वाचा भाग असून, या परिसरातूनच जळगाव तालुक्यातील ३२ गावांमधील नागरिकांसह चोपडा व यावल तालुक्यातील वाहतूकदेखील याच भागातून होत असते. नेहमी वाहतुकीची वर्दळ असलेल्या या परिसरातील रस्त्यांकडे मात्र मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी या भागातील अमर चौक परिसरात मालवाहतूक करणारी ट्रक खड्ड्यात फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ही परिस्थिती केवळ एक दिवसापुरती नसून गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील नागरिक खराब रस्त्यांच्या समस्येला तोंड देत आहेत.

भुयारी गटार योजनेने लावली रस्त्यांची वाट

शहरात अमृत योजनेंतर्गत झालेल्या भुयारी गटार योजनेचे ४० टक्के काम हे केवळ शिवाजीनगर परिसरात झालेले आहे. त्यात मनपा अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे निविदेत केलेल्या चुकीमुळे भुयारी गटार योजनेंतर्गत खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारावर न सोपविल्याने ठेकेदाराने रस्ते खोदल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली नाही. ही जबाबदारी महापालिकेने स्वतःवर घेतल्यामुळे महापालिकेनेदेखील या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना शहरासाठी चांगली ठरली असली तरी शिवाजीनगर भागातील नागरिकांना ही योजना चांगलीच त्रासदायक ठरत आहे.

अपघात झाले नित्याचेच

शिवाजीनगर भागाकडून कानळदा व ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यासह शिवाजीनगरातील अंतर्गत रस्त्यांचीदेखील पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यात पाऊस झाल्यानंतर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. त्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने व भुयारी गटार योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या चाऱ्यांचीदेखील दुरुस्ती मनपाने न केल्यामुळे या भागातील रस्त्यांवर लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहेत.

आंदोलन करून व निवेदने देऊनदेखील झाला नाही फायदा

शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत ५० हून अधिक निवेदने सादर झाली आहेत. तसेच रस्त्यांच्या समस्येबाबत या भागातील नागरिकांनी आतापर्यंत गेल्या तीन वर्षात दहापेक्षा जास्त आंदोलने केली आहेत. मात्र निवेदने देऊन व आंदोलने करूनदेखील महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच मनपा प्रशासनाने काही महिन्यापूर्वी या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती केली होती. मात्र, काही महिन्यातच या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

या भागात येणाऱ्या कॉलनी

गेंदालाल मिल, शिवाजीनगर, लाकूड पेठ, दांडेकरनगर या सर्व भागांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

नगरसेवक - ८

लोकसंख्या - ३४ हजार

तीन तालुक्यांची वाहतूक या भागातून होते.