शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 2:58 PM

जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न ...

जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून बुधवारी शिवसेना महानगरच्यावतीने मनपावर धडक मोर्चा काढत मनपा आयुक्तांना गाजरं भेट दिली. तसेच लवकरात लवकर कचºयाचा प्रश्न मार्गी न लावल्यास शहरातील सर्व कचरा मनपा आवारात फेकण्याचा इशारा दिला आहे.शिवसेनेकडून दुपारी १२ वाजता जयकिसनवाडी भागातून महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेत हा मोर्चा पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना गाजरे भेट दिली.मनपा प्रशासनाकडून ७५ कोटी रुपयांचा मक्ता देवून नागरिकांना स्वच्छतेच्या नावावर गाजरंच दिली असल्याने शिवसेनेकडूनही मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना गाजरांची भेट देण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख विलास भदाने, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शहर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, ज्योती तायडे, जितेंद्र मुंदडा, प्रशांत नाईक, शंतनू नारखेडे, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी, प्रकाश जैन-बेदमुथा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.१५ नोव्हेंबरनंतर प्रश्न मार्गी लावूआतापर्यंत कचºयाचा समस्यांबाबत गंभीर दखल घेवून मक्तेदाराला वेळोवेळी नोटीस देवून, त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तरी पुन्हा त्यांना सूचना देवून १५ नोव्हेंबरनंतर शहरातील कचºयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.मक्तेदाराकडून या कामात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिले.सतरा मजलीच्या बाहेर येवून जरा शहरात चक्कर माराकचºयाचा समस्येबाबत सत्ताधाºयांपासून विरोधक व नागरिक देखील तक्रारी दाखल करत असताना मनपा प्रशासन झोपेतून उठताना दिसून येत नाही. प्रत्येक गल्ली-चौकात कचºयाचे ढीग जमा झाले असून, जरा सतरा मजलीच्या बाहेर येवून शहरात चक्कर मारा आणि समस्या पहा असा सल्ला मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी उपायुक्त व आरोग्य अधिकाºयांना दिला. स्वच्छतेच्या इतक्या तक्रारी असून देखील मक्तेदाराला १ कोटी ३६ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्याचे इतके लाड कशासाठी असा सवालही पदाधिकाºयांनी केला.शाहू नगरातील रहिवाश्यांचाही मनपावर मोर्चाशाहुनगरात गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात मनपाकडून साफसफाई केली जात नाही, वारंवार निवेदने देवून तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शाहू नगरातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. तसेच समस्यांचा नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचला. या नागरिकांना देखील आयुक्तांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हाजी मुन्ना, नजमोद्दीन शेख, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बांगी याकुब, अफरोज बागवान, अंजली चव्हाण, पार्वताबाई देवरे यांच्यासह शाहुनगरच्या नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रत्येक प्रभागात वाईट अवस्था आहे, त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव