शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

अठरा महिन्यांपैकी सात महिने उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:03 PM

दुर्लक्ष : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे धिम्या गतीने काम; वेळेत काम पूर्ण होणे अवघड

जळगाव : जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात १८ पैकी सात महिने उलटले आहेत. सद्यस्थितीला पुलाची पाया भरणीदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अकरा महिन्यांत हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न संतप्त जळगावकरांतर्फे उपस्थित केला जात आहे.रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जीर्ण झालेला शिवाजीनगर पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. रेल्वेतर्फे रेल्वेच्या हद्दीतीलच काम करण्यात येणार असून उर्वरित काम बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेऊन २५ फेब्रुवारीला पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेऊन ८ एप्रिलला पुलावरील सर्व गर्डर काढले होते. गर्डर काढल्यानंतर पुढील कामासाठी रेल्वेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाचे काम सोपविले आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.धीम्या गतीच्या कामामुळे नागरिकांचा संतापरेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजीनगर वासियांनी पर्यायी रस्ता म्हणून तहसिल कार्यालयाजवळ गेट उभारण्याची मागणी केली होती. यासाठी तत्कालीन खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, डीआरएम, जिल्हाधिकारी यासह मनपा आयुक्तांकडे निवेदन दिले होते. तसेच यासाठी शिवाजीनगरवासियांना रेल रोको आंदोलनदेखील करावे लागले होते.महावितरणतर्फे अद्याप निविदाच नाही... शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणतर्फे आचार संहितेनंतर निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र, आचारसंहिता संपून आठवडा उलटल्यानंतरही महावितरणतर्फे अद्याप निविदा काढण्यात आलेली नसल्याने या कामाला पुन्हा विलंब होणार आहे. येत्या दोन दिवसात निविदा निघणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव