शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

मुक्ताईनगर : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आंतरजिल्हा प्रवास बंदी करण्यात आली असून खासगी वाहनधारक लूट ...

मुक्ताईनगर : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आंतरजिल्हा प्रवास बंदी करण्यात आली असून खासगी वाहनधारक लूट करत असल्याने किमान तालुक्याच्या आत तरी प्रवासी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.

मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच डेपोमध्ये " जैसे थे"या स्थितीत बस उभ्या आहेत. राज्याच्या लॉकडाऊनच्या नियमावलीमध्ये जिल्हा अंतर्गत बस फेऱ्या बंद आहेत. प्रवास करण्यास मुभा नाही. मुक्ताईनगर आगारातून दररोज एक बस जळगाव येथे व तीच बस जळगाव मुक्ताईनगरला परत अशा दोन फेऱ्या करत आहे, परंतु तालुक्याच्या अंतर्गत मात्र बससेवा बंद आहे.

गेल्या तीन महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आणि विशेषतः खेड्यापाड्यावर रुग्ण आढळून आल्याने मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या ही मोठ्या संख्येने वाढलेली दिसून आली. या रुग्णांना घरूनच सोईसुविधा काढा, जेवण व गरम पाणी पुरवता यावे तसेच काढा व गरम पाण्याचीदेखील सोय करता यावी म्हणून तालुक्यातील विविध छोट्या-छोट्या खेड्यांमधून रुग्णांचे नातेवाईक मुक्ताईनगरकडे धाव घेत आहेत. मात्र मुक्ताईनगरसाठी बससेवाही सुरू नसल्याने खासगी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची लूट केली जात आहे. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली जाण्यासाठी ८० रुपये भाडे, तर कुऱ्हा येथे जाण्यासाठी १०० रुपये भाडे आकारले जात आहे. बसचे भाडे ३० व ३५ रुपये अनुक्रमे असताना तीन पटीने अव्वाच्या सव्वा भाडे आकारून रुग्णांच्या नातेवाईकांची व प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हीच परिस्थिती असून त्यासाठी नागरिक व प्रवासी खासगी वाहने करतात. हजारो रुपये भाडे देऊन किंवा मोटारसायकलने जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यामुळे किमान तालुका अंतर्गत बससेवा तरी सुरू करण्यात यावी.

मुक्ताईनगर येथून कुऱ्हा ,अंतुर्ली चांगदेव व बोदवड साठी बससेवा सुरू करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. किमान एक बस जाण्यासाठी व सायंकाळी परतण्यासाठी दुसरी बस अशा दोन बस तरी असाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तालुक्यातील खेडेगावातून बस सेवा सुरू असल्यास तेच प्रवासी जळगावसाठीसुद्धा पुढच्या बसला जाऊन प्रवासी मिळू शकतात. हा विचार एसटी आगाराने करावा व तत्काळ बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.