शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या ...

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष

जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून करण्यात येत आहे. यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला प्रथमच मतदान करण्याची संधी मिळाली व ते आपण केले याचा अभिमान वाटतो, अशा भावना नवमतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच प्रबोधन करणारी उपक्रम राबविले जातात. विशेषत: १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरुणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जातो.

प्रशासकीय पातळीवर असे उपक्रम राबविले जात असले तरी प्रत्येक नागरिकाचे सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे हे कर्तव्य आहे, या भावनेतून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून केले जात आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. या प्रमाणेच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना निर्माण होण्याची गरज असल्याचे मत वडली येथील प्रियंका रमेश पवार या प्रथमच मतदान केलेल्या तरुणीने व्यक्त केले.

मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस असून थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे, असे मत ममुराबाद येथील दिग्विजय शरद पाटील या प्रथमच मतदान केलेल्या तरुणाने व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले याचा अभिमान वाटतो. प्रत्येकाना आपला हा हक्क बजावलाच पाहिजे. गावाच्या विकासासाठी विकासाभिमुख उमेदवाराला यातून निवडता येते.

- प्रियंका रमेश पवार, नवमतदार.

मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

- दिग्विजय शरद पाटील, नवमतदार.