शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
4
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
5
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
6
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
7
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
8
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
9
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
10
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
11
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
12
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
13
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
14
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
15
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
16
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
17
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
18
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
19
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
20
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 20:35 IST

...अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जून रोजी, जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला अनुदान आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

खडसे म्हणाले, की जिल्ह्यातील ६० टक्के उत्पादकांचा कापूस घरात आहे. सरकारने कापसाला प्रति क्विंटल किमान ६ हजार रुपये अनुदान किंवा मदत दिली पाहिजे. कांदा उत्पादक दराअभावी अडचणीत आहेत. जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री असूनही शेकडो गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यांचा स्वत:चा मतदारसंघ आणि गावदेखील यातून सुटलेले नाही. जिल्ह्यात २५ टँकर सुरू आहेत. १५० ची मागणी आहे; पण ते प्रशासनाकडून मंजूर होत नाहीत. जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार होत आहेत. जामठीमध्ये ७०० फूट बोरिंग करूनही पाणी लागत नाही तरीही योजना मंजूर झालेली असते. पाणी नसताना कार्यादेश देण्याची घाई केली जात आहे. लक्ष्मी दर्शनाचा लाभ होईल म्हणून निविदा दिली गेली. योजनेचा आराखडा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याऐवजी गुगल मॅपच्या साहाय्याने केला जात आहे, असा आरोपही खडसे यांनी केला.

कार्यक्षम गृहमंत्र्यांनी करून दाखवावेजिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे. वाळू माफिया आहेत. २१ वेळा एसपी, आयजी, डीजी, गृहमंत्री यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. उलट हप्ते वाढतात. देवेंद्र फडणवीस कार्यक्षम गृहमंत्री आहेत. त्यांनी अवैध व्यवसाय बंद करून दाखवावेत, असे आव्हान खडसे यांनी दिले.

गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाचा वापरमुख्यमंत्र्यांना भीती आहे, की शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जनता उपस्थित राहणार नाही. म्हणून शासकीय योजनांचे लाभार्थी आणा, असे अलिखित निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही आमदार खडसे यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मंगला पाटील आदी उपस्थित होते.

बंडखोरांमुळे कोणते प्रश्न सुटले...आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांसोबत गेल्याचे म्हणतात पण त्यानंतर एक वर्षात जिल्ह्याचे कोणते प्रश्न सुटले, अशी विचारणा खडसे यांनी केली. मुख्यमंत्री एकाच वर्षात चौथ्यांदा जळगाव जिल्ह्यात येत आहेत. एक तर त्यांचे जिल्ह्यावर अधिक प्रेम असेल किंवा जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी करून त्यांना मदत केली आहे असाच होतो, असेही खडसे म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगावChief Ministerमुख्यमंत्री