शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 20:35 IST

...अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जून रोजी, जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला अनुदान आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

खडसे म्हणाले, की जिल्ह्यातील ६० टक्के उत्पादकांचा कापूस घरात आहे. सरकारने कापसाला प्रति क्विंटल किमान ६ हजार रुपये अनुदान किंवा मदत दिली पाहिजे. कांदा उत्पादक दराअभावी अडचणीत आहेत. जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री असूनही शेकडो गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यांचा स्वत:चा मतदारसंघ आणि गावदेखील यातून सुटलेले नाही. जिल्ह्यात २५ टँकर सुरू आहेत. १५० ची मागणी आहे; पण ते प्रशासनाकडून मंजूर होत नाहीत. जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार होत आहेत. जामठीमध्ये ७०० फूट बोरिंग करूनही पाणी लागत नाही तरीही योजना मंजूर झालेली असते. पाणी नसताना कार्यादेश देण्याची घाई केली जात आहे. लक्ष्मी दर्शनाचा लाभ होईल म्हणून निविदा दिली गेली. योजनेचा आराखडा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याऐवजी गुगल मॅपच्या साहाय्याने केला जात आहे, असा आरोपही खडसे यांनी केला.

कार्यक्षम गृहमंत्र्यांनी करून दाखवावेजिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे. वाळू माफिया आहेत. २१ वेळा एसपी, आयजी, डीजी, गृहमंत्री यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. उलट हप्ते वाढतात. देवेंद्र फडणवीस कार्यक्षम गृहमंत्री आहेत. त्यांनी अवैध व्यवसाय बंद करून दाखवावेत, असे आव्हान खडसे यांनी दिले.

गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाचा वापरमुख्यमंत्र्यांना भीती आहे, की शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जनता उपस्थित राहणार नाही. म्हणून शासकीय योजनांचे लाभार्थी आणा, असे अलिखित निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही आमदार खडसे यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मंगला पाटील आदी उपस्थित होते.

बंडखोरांमुळे कोणते प्रश्न सुटले...आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांसोबत गेल्याचे म्हणतात पण त्यानंतर एक वर्षात जिल्ह्याचे कोणते प्रश्न सुटले, अशी विचारणा खडसे यांनी केली. मुख्यमंत्री एकाच वर्षात चौथ्यांदा जळगाव जिल्ह्यात येत आहेत. एक तर त्यांचे जिल्ह्यावर अधिक प्रेम असेल किंवा जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी करून त्यांना मदत केली आहे असाच होतो, असेही खडसे म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगावChief Ministerमुख्यमंत्री