शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान विषयासाठी विषय शिक्षकच नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST

स्टार - ९७६ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयांसाठी विषय ...

स्टार - ९७६

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयांसाठी विषय शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक प्रक्रियेचे वर्ग गणित व विज्ञान विषय शिक्षकांअभावी बंद पडत चालले आहेत. त्यामुळे पात्र शिक्षकांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आहेत़ त्यापैकी इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्ग अध्यापनासाठी स्वतंत्र विषयावर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार उच्च प्राथमिक वर्गांना (सहावी ते आठवी) गणित, विज्ञान, भाषा व समाजशास्त्र, असे विषयनिहाय शिक्षक असावेत, असे धोरण आहे. जळगाव व जिल्ह्यातील शाळांमध्ये भाषा विषय पदवीधर व समाजशास्त्र विषय पदवीधर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, तर समाजशास्त्र विषयाची बरीच पदे अतिरिक्त झालेली आहेत. त्यांना गणित, विज्ञान विषय शिक्षकांच्या जागी नियुक्ती दिलेली आहे़; मात्र महत्त्वाच्या व मुख्य विषय समजल्या जाणाऱ्या गणित व विज्ञान विषयांसाठी विषय शिक्षक नाहीत.

सलग दोन वर्षे मागविली होती माहिती

जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी संबंधित विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी व त्याअनुषंगाने माहिती संकलन करण्यासाठी २१ डिसेंबर २०१९ व २ मार्च २०२० रोजी पत्रे जारी केली होती़ त्यानुसार सर्व माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त असूनही अद्यापर्यंत बीएस्सी पदवी प्राप्त केलेले बरेच पात्र शिक्षक असूनही संबंधितांना गणित, विज्ञान विषय शिक्षकपदी नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

अडीचशे जागा रिक्त?

केवळ विज्ञान विषयांची अडीचशे जागा रिक्त असल्याची माहिती एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली, तर भाषा व समाजशास्त्र विषयांसाठी विषय शिक्षण पूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

६६ शिक्षकांचे समायोजन

दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी ६६ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्राथमिक विभागांतर्गत अल्पसंख्याक शाळांमधील १२ तर बिगर अल्पसंख्याक शाळांमधील १४ असे एकूण २६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन करण्यात आले आहे, तर माध्यमिक विभागांतर्गत ४० शिक्षक अतिरिक्त ठरले होते, त्यांचेही समायोजन करण्यात आले आहे.