शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून बीटी कापसाच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रावेेर : एकीकडे शेती उत्पादन दुप्पट करण्याचे दिवास्वप्न केंद्र सरकारकडून दाखवले जात असले तरी गत तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेेर : एकीकडे शेती उत्पादन दुप्पट करण्याचे दिवास्वप्न केंद्र सरकारकडून दाखवले जात असले तरी गत तीन वर्षांपासून बीटी कापसाच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. जैवतंत्रज्ञानावर आधारित डबल बीटी कापसाचे बियाणे लागवड करूनही रसशोषक किडी व बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव होऊन फवारण्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना गत तीन वर्षांपासून निम्म्यापेक्षा जास्त उत्पन्नात दरवर्षी घट येत आहे. यामुळे शासनाच्या जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाणे निर्मितीतील गुणनियंत्रण करणाऱ्या शासकीय रासायनिक प्रयोगशाळांवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून पांढरे सोने म्हणून गणले जाणाऱ्या कापसाच्या पिकावर सारी दारोमदार राहत असल्याने पूर्वहंगामी बागायती कापूस व जिरायत कापूस लागवडीला प्राधान्य दिले जाते. गत तीन वर्षांपासून बळीराजाचे दुर्दैव म्हणावे? की बीटी कापूस बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची उडवली जाणारी थट्टा म्हणा, बीटी कापसाच्या उत्पादनाचा रसशोषक किडी व बोंडअळीमुळे फरदड तर सोडाच. मात्र, पूर्वहंगामी कापसाच्या एक्क्याचा अर्ध्यातच गाशा गुंडाळला जात असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचा अर्ध्यावरती डाव मोडत असल्याने त्यावर होणारा उत्पादन खर्चही निघत नसल्याने गत तीन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘घाटे का सौदा’ होत आहे. फूल व फळधारणेच्या अवस्थेत पांढऱ्या सोन्याची हिरवी स्वप्ने बळीराजाच नव्हे, तर बांधावर न पोहोचणारी शासन यंत्रणाही रंगवून खरिपाच्या पीक आणेवारीचे आकडे ५० पैशांपेक्षा जास्त रंगवत असल्याने बळीराजाचे खऱ्या अर्थाने निसर्गच नव्हे, तर कापूस बियाणे निर्मात्यांपासून, व्यापारी ते थेट शासन यंत्रणेकडूनही फसवणूक होत असल्याचा आरोप बळीराजातून होत आहे.

एकीकडे शासन राज्यकर्ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा बोलघेवडेपणा करीत असताना दुसरीकडे शेती उत्पादन निम्म्यापेक्षा जास्त घटत असल्याची कापूस उत्पादनाची भीषण परिस्थिती त्या बोलघेवड्यापणाला हरताळ फासणारी ठरली आहे. बीटी कापूस बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे गुणनियंत्रण वस्तुत: केले जाते की नाही? की नुसतेच चिरीमिरीतून कागदी घोडे नाचवत ‘टेस्टेड ओके’ची रबरी शिक्के मारले जातात? असा संताप कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. डबल बीटी कापूस बियाणे असल्याने त्यावर रसशोषक किडी वा बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायला नको. मात्र, बीटी कापसाच्या बियाण्यांचे बीजांकुरण झाल्यापासूनचे दोन पानांवर कपाशी असताना रसशोषक किडींचे आक्रमण व्हायला सुरुवात होत आहे. संकरित वाणाचे कापसाच्या पिकांपेक्षा जास्त महागड्या कीटकनाशकांच्या फवारणी व उत्पादन खर्चही करावा लागत असल्याने अशा बीटी अर्थात जैवतंत्रज्ञानाला काय अर्थ उरतो? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे. कापूस बियाणे कंपन्यांच्या जैवतंत्रज्ञानाची गुणवत्ता घसरली का? की जैवतंत्रज्ञान निसर्गापुढे फोल ठरतेय? यासंबंधी शासनाकडून संशोधन व उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे.

बी.टी. कापूस लागवड वर्षानुवर्षांपासून आपल्याकडे होत असल्याने निसर्गत: असलेल्या किडींची त्या कापसाच्या पिकातील प्रतिबंधक जीन्सवर मात करण्यासाठीची प्रतिकार शक्तीही दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचा निसर्गदत्त नियमानुसार अंदाज आहे. यावर्षी उशिराने सुरू असलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे बीटी बियाणांची गुणवत्ता घसरतेय, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, प्रतिकारशक्ती फोफावलेल्या त्या रसशोषक किडी वा बोंडअळीवर मात करणारे अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाची गरज स्पष्ट होत आहे.

-एम.जी. भामरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, रावेर