शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची मनोवृत्ती संकुचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:43 IST

सुनील महाजन यांची टीका : २५ कोटींचे खरे श्रेय जलसंपदामंत्र्यांचे

जळगाव : शहरासाठी २५ कोटींचा निधी आणण्याचे श्रेय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे असून त्यासाठी महापौरांनी नियमितपणे पाठपुरावा केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. याउलट आमदार भोळे यांची मनोवृत्ती संकुचित असून त्यांनी या निधीतील कामे ठरविण्यासाठीच्या समितीत मनपातील त्यांच्या विरोधी पक्षनेता अथवा गटनेत्याला सुद्धा स्थान न देऊन स्वपक्षाच्या सदस्यांवरच अविश्वास दर्शविला असल्याची टीका माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत केली.महाजन यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री जिल्हा दौºयावर आलेले असताना स्थानिक भाजपा नगरसेवकांसह तत्कालीन महापौरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरासाठी निधीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी शहरासाठी देण्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून दीड दोन वर्षात आमदार सुरेश भोळे यांनी या निधीसाठी किती पाठपुरावा केला? हा संशोधनाचा विषय आहे.  याउलट महापौरांनी मनपाचे जिल्हाधिकाºयांनी परस्पर वळते केलेले १० कोटी जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून परत आणले. गेल्या १ वर्षापासून महापौरांनी मुंबईला मंत्रालयात जाऊन जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तसेच वेळोवेळी आवश्यक ठराव, प्रस्ताव देऊन या २५ कोटींच्या निधीचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आॅगस्ट २०१६ मध्ये शासनाने मनपाला पत्र देऊन अर्थसंकल्पात या २५ कोटींची तरतूद केल्याचे पत्र                 दिले. ...तर महत्त्वाचे प्रश्न सोडवाआमदार भोळे यांना शहर विकासाचा खरच पुळका असेल तर त्यांनी शहरातील समांतर रस्ते, मार्केट गाळे करार, शिवाजीनगर व पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल आदी ज्वलंत प्रश्न सोडवावेत. १८ मार्केटचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन तर आमदारांनी निवडणूक जाहीरनाम्यातच दिले होते. मात्र अडीच वर्ष उलटूनही हा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा. न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये. बजरंग बोगद्याच्या कामासाठीही आमदार, खासदारांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.मनपाने त्यासाठी पाठपुरावा केला. तसेच पावणेचार कोटींचा निधीही रेल्वेला दिला. मात्र            त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदारांनी केल्याची टीका महाजन यांनी केली. शासनाने शहर विकासाच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र त्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. तर आमदार भोळे यांनी वारंवार केलेल्या तक्रारींमुळे ही समिती नेमली आहे. शहरातील कामे या निधीतून करावयाची असताना त्यात मनपाचा एकही प्रतिनिधी घेतलेला            नाही. आमच्यावर विश्वास नसेल तर समजू शकतो. मात्र भाजपाचे मनपातील विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक वामनराव खडके किंवा गटनेते सुनील माळी यांना तरी समितीत घ्यायला हवे होते. मात्र आमदारांनी त्यांच्यावरही अविश्वास दाखविला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाचे मिशन ५० प्लस ऐवजी मिशन १५ प्लस तर नाही ना? अशी शंका येते, अशी टीका त्यांनी केली.