शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कमळाच्या फुलांनी हरताळा तलाव बनला नयनरम्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील तलावात गेल्या १० वर्षांपासून तलावाचे पाणी आटले असताना कमळ पूर्ण नेस्तनाबूत झाले ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील तलावात गेल्या १० वर्षांपासून तलावाचे पाणी आटले असताना कमळ पूर्ण नेस्तनाबूत झाले होते. मात्र, गेल्या वर्षापासून येथे निसर्गाच्या कृपेमुळे जलसाठा शिल्लक राहत असल्याने कमळ फुलांनी तलावात पुन्हा डोके वर काढत हरताळे तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. तलावात दोन खळे एवढ्या भागात दोन ठिकाणी कमळाची फुले उमलली आहेत.

२० वर्षांपूर्वी संपूर्ण तलाव कमळाच्या फुलांनी व्यापला होता. संपूर्ण १७५ हेक्टर ५६ आर. जलसाठा असलेल्या तलावात कमळ शेती करण्यात येत होती. काही ठेकेदारांनी त्यावर चांगलाच डल्ला मारत कमाई केली. परप्रांतात येथून कमळाच्या वाट्या आयशर, छोटा हत्ती आदी वाहनांतून भरून पाठवण्यात येत होत्या; परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये कमी पावसामुळे तलावात पाणी साचत नव्हते आणि त्यातही कमळ संपूर्ण नष्ट झाले होते; परंतु आता येथील बेहर बेटमध्ये बांधण्यात आलेल्या साई मंदिर परिसरात कमळाने पुन्हा डोकं वर करीत जवळपास दोन खड्ड्यांत आपला अधिवास सुरू केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांनादेखील कमळाच्या फुलाचे सौंदर्य पाहून भुरळ पडत आहे. पूर्वी येथे कमळ असताना २००३ मध्ये श्रावणबाळ समाधी मंदिर जीर्णोद्धार करण्याच्या वेळेस करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी या तलावाचे नामकरणदेखील लक्ष्मीसागर असे केले होते.

ग्रामस्थांना मात्र येथे कमळ नकोच

कमळाची फुले आकर्षक व मोहक वाटत असली तरी ठरावीक मर्यादेपुरते ठीक आहे. मात्र, संपूर्ण तलावात ते वाढल्यास त्याचा धोका मात्र या तलावाला आहे. त्यातून कोणतेच उत्पन्न गावकऱ्यांना मिळत नाही. पूर्वी कमळावर अनेकांनी खूप पैसा कमावला. कमळ शेतीमुळे मत्स्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येते. केवळ देखावा म्हणून विशिष्ट भागात त्याची वाढ ठीक आहे; परंतु संपूर्ण तलावभर कमळ उगवायला नको. त्यामुळे तलावाचे सर्व पाणी दूषित होऊन निरुपयोगी ठरत असल्यामुळे असे मंदिर सेवेकरी मधुकर भगत, गजानन ठाकूर, माजी सरपंच जयेश कार्ले, जितेंद्र वाघ व अन्य ग्रामस्थांचे मत आहे.

तलावात बोटिंगसाठी कमळाव्यतिरिक्त पाणीसाठा जिवंत असला पाहिजे. पर्यटनाला चालना मिळेल. तलाव सुशोभीकरण यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागच्या वेळेस प्रस्ताव पाठवलेला होता. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही. पर्यटकांसाठी आकर्षण ठरते; पण कमळ मर्यादेतच असले पाहिजे.

-भागवत धबाडे, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, मुक्ताईनगर

मोजक्याच जागी कमळ उगवले पाहिजे. कारण मासेमारी करताना अडचणी निर्माण होतात, पाणीही दूषित होते. पूर्ण तलावात कमळ वाढू देऊ नये. मासेमारीवरच गावाची उपजीविका अवलंबून आहे. तलावाचा फायदा गावकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

-समाधान कोळी, मासेमारी मजूर