शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाला, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:30 PM

मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ही घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

ठळक मुद्देवरगव्हाणची घटना : भिंत कोसळल्याने सहा महिला जखमी, दुर्दैवी घटनेने शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क

बिबिडगाव, ता. चोपडा : मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ओट्यावर बसलेल्या असताना भिंत कोसळून एक आदिवासी महिला ठार तर सहा महिला जखमी झाल्याची घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

पुरूष मंडळी प्रेत घेऊन स्मशानभूमीत गेले होते. समाज प्रथेप्रमाणे सर्व महिला गावहाळ जवळ हातपाय धुण्यासाठी गेल्या असताना शेजारीच असलेल्या एका बांधकामाच्या ओट्यावर काही महिला बसल्या. क्रूर काळाने या गरीब आदिवासी महिलांवर आपला डाव साधत ओट्यासह भिंत कोसळली. व एक महिला जागीच ठार झाली तर तब्बल सहा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी वरगव्हान येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे रामा रतन पावरा यांची  सून उषाबाई विजय पावरा यांचे निधन झाले होते. त्यामुळे नातेवाईक व आप्तेष्ट अंत्यसंस्कारासाठी जमलेले होते. मयत महिलेचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पुरूष मंडळी घेऊन गेले होते. इकडे सर्व महिला समाज प्रथेप्रमाणे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गावहाळवर गेल्या व काही महीला शेजारीच बांधकाम सुरु असलेल्या भिकन दमड्या पावरा यांच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक ओट्यासह घराची भिंत पडली व क्षणात होत्याचे नव्हते झाले. यात गावातीलच जेलीबाई परशुराम बारेला ही अपंग महिला जागीच ठार झाली तर त्यांच्यासोबत लालबाई मारसिंग पावरा, कुसुमबाई नरसिंग पावरा, कालुबाई प्रताप बारेला, बाकलीबाई भाईदास पावरा, जसुबाई शेवा पावरा, सायकाबाई भायला पावरा या गंभीर जखमी झाल्या.

घटना घडली तेव्हा सर्व पुरुष अंत्ययात्रेत गेले होते. यावेळी गावाचे सरपंच भूषण पाटील यांनी स्वतःच्या गाडीत जखमींना टाकत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी उपचार करत जखमींना अधिक उपचारासाठी जळगावी रवाना केले.

याठिकाणी पं. स.चे उपसभापती सुर्यकांत खैरनार यांनी भेट दिली तर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तलाठी सरोवर तडवी यांनी भेट दिली तर अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनीही आपले सहकारी पाठवत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले.

पती - पत्नीचा आधीच अपंगत्वाशी संघर्ष

पती आणि पत्नीचा अपंगत्वाशी संघर्ष करतच संसार सुरु होता. त्यांना तिन्ही मुलीच.. आणि आता क्रुर काळाने पत्नीलाही हिरावले. असा दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग हा या घटनेतील मयत जेलीबाईचे पती परशुराम नागराज पावरा यांच्यावर आलाय. पत्नी अपंग असुनही काम करायच्या, स्वतः ही अपंग असतांना गुो चारून आपल्या संसाराचा शगाडा चालवून तिन्ही मुलींचे शिक्षण करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यातही आता क्रुर काळाने घात करुन पत्नीलाही कायमचं हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत असून किमान शासनाने तरी या दुर्दैवी परशुराम यांच्या या संकटात आर्थिक फुंकरचा मलम लावावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाDeathमृत्यू