शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींनी सादर केला नाही जैवविविधतेचा डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जैवविविधता कायदा (२००२) नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जैवविविधता कायदा (२००२) नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि नोंदवही तयार करण्याचा सूचना राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी दिल्या होत्या, तसेच महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी आपापल्या भागातील जैवविविधतेची नोंद करून, त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, आता दीड वर्ष होऊनदेखील जिल्ह्यातील ६०० हून अधिक ग्रामपंचायतींनी याबाबतची कोणतीही नोंद केली नाही. राज्य शासनाच्या जैवविविधता नोंदवही उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील अनेक संस्थांनी केवळ कमाईचा गोरखधंदा व शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठीच करून घेतल्याचे दिसून आले आहे.

जैवविविधतेची नोंद करता यावी यासाठी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी काही संस्था नेमून ही नोंद तयार करून, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या, तसेच या कामात कुचराई करणाऱ्या ग्रामपंचायती व मनपांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारादेखील दिला होता.

काय होता उपक्रम

जैवविविधता नोंदवही उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव, परिसर, शेतशिवार, नदी, नाले, शहर व परिसराची पाहणी करून त्या ठिकाणांवर आढळणाऱ्या वनस्पती संपदा, खनीज, प्राणी, पक्ष्यांची नोंद करून ही माहिती जैवविविधता नोंदवहीत लिहिली जाणार होती. त्यामुळे आपल्या परिसरातील आढळणाऱ्या जैवविविधतेची माहिती प्रत्येकाला मिळू शकेल. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरदेखील या समित्या स्थापन करण्याचा सूचना दिल्या होत्या.

केवळ अनुदान लाटण्यासाठी केला फायदा

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील सर्व गावे व जंगलांमधील जैवविविधतेच्या नोंदी घेण्याचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने काही संस्थावर सोपविले होते. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळे व युवकांच्या संस्थांना हे काम देण्यात आले होते. त्यामुळे ज्या संस्थांना पर्यावरणाचा कोणताही गंध नव्हता, अशा संस्थांमधील सदस्यांना वनस्पतीचे प्रकार, कीटकांच्या प्रकारांबाबत काय माहिती असेल, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे, तर अनेक संस्थांनी, तर प्रत्यक्ष पाहणी न करता थेट अहवाल तयार करून, शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचेच काम केल्याचे दिसून आले.

दृष्टिकोन मोठा, गांभीर्य मात्र नावालाच

स्थानिक परिसरात आढळणारे पशू, पक्षी, वृक्ष, झुडपे यांचे संवर्धन होण्याचा दृष्टीने हा उपक्रम राबविण्याचे धोरण होते. यासह स्थानिक लोकांचा सहभाग घेऊन त्यातील जैवविविधतेबाबत जनजागृती करणे, स्थानिक परिसरात इको-टुरिझम विकसित करणे, मातीच्या नमुन्यातील सूक्ष्मजीव शोधणे व त्यांचा उपयोग कृषी उद्योग, प्राण्यांचे खाद्य, मानवी पोषण यासाठी करणे, पाणथळ क्षेत्रांमध्ये किती मत्स्योत्पादन होऊ शकेल, याचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन होता. मात्र, शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचेच काम या उपक्रमातून झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.