शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद, कडधान्य पीक बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने कडधान्य पेरणीच्या काळात पेरणीनंतर पाऊसच पडला नसल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हरताळा, ता. मुक्ताईनगर : गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने कडधान्य पेरणीच्या काळात पेरणीनंतर पाऊसच पडला नसल्याने उडीद, मूग उगवलेच नाही. पावसाअभावी पेरले असता तेही करपले. त्यामुळे मूग, उडीद, चवळी आदी कडधान्याचे उत्पन्न बुडाल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.

डोंगराळ भागात उडीद, मूग, चवळी कडधान्य चांगले येते; परंतु ५० टक्क्यांपेक्षा अधिक भागात अजूनही पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबलेल्या दिसत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कडधान्यासाठी वेळेवर पाऊस येणे महत्त्वाचे असते. ६५ दिवसात काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी जुलैच्या दोन आठवडे आधी झाली तरी त्यावर पावसाअभावी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात सरासरी १५ जूननंतर कडधान्याची पेरणी केली जाते. आता एक महिना उलटला तरी या पिकाविषयीचे चित्र अधांतरीच आहे.

गतवर्षाच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरात हाताशी आलेले मूग व उडीद पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने या परिस्थितीत परिसरातील निम्म्यापेक्षा अधिक डोंगराळ भागात पाऊसच नसल्याने निम्म्यापेक्षा अधिक भागात पेरणी होऊ शकली नाही. तसेच उगवलेल्या पिकाचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही कडधान्याच्या हंगामापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.