शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची आवक आली १० ते १५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग वाढत आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग वाढत आहे. यामुळे घरात असलेले धान्य व इतर शेतीमाल विक्री करण्यासाठी धावपळ होत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान धान्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे. दुकानांच्या वेळा मर्यादित असल्याने, या काळात धान्यविक्री पूर्णपणे होत नसल्याने, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक १० ते १५ टक्क्यांवर आली आहे. त्यात धान्याचे भावही कमी होत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून त्याचा मोठा परिणाम अजूनही जाणवत आहे. गेल्या वर्षी कडक लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांना चांगलीच झळ बसली. सप्टेंबर महिन्यानंतर स्थिती सुधारत असताना, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व व्यवसायांवर परिणाम होणे सुरू झाले. कोरोना नियंत्रणासाठी जनता कर्फ्यू, तीन दिवस कडक निर्बंध असे नियम घालून देण्यात आले. तरीही कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अखेर ‘ब्रेक द चेन’ लागू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने, दिवसभर काही ना काही खरेदीच्या नावाने नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याची स्थिती होती. त्यामुळे अखेर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवण्याची अट घालण्यात आली. यामध्ये बाजार समितीमध्येही याच वेळेत व्यवहार होत आहेत.

उशिरा आल्यास माल न्यावा लागतो परत

बाजार समितीतील व्यवहारांवरही वेळेच्या मर्यादा आल्याने ११ वाजेनंतर धान्य खरेदीही केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल सकाळी ११ वाजेनंतर आणल्यास त्यांना तो परत न्यावा लागत आहे. त्यामुळे सकाळी चार तासांत जेवढा माल खरेदी होईल, तेवढाच माल बाजार समितीमध्ये उपलब्ध राहत आहे. परिणामी, शेतकरीही सकाळी उशीर झाल्यास माल आणत नसून दुसऱ्या दिवशी तो आणतात. दररोज अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने आवकही घटत आहे.

शेतीकामासाठी पैशांची जमवाजमव

खरीप हंगाम तोंडावर येत असल्याने शेती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे घरात असलेला शेती माल विकणेही आवश्यक असल्याने, शेतकरी तो विक्रीचा प्रयत्न करीत आहे. त्यात दुकानांच्या वेळा मर्यादित असल्याने माल नेल्यानंतर जो भाव मिळेल, त्या भावात त्याची विक्री करीत आहे.

दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)

धान्य आवक भाव

गहू १५० ते २०० १८०० ते २३००

ज्वारी ६४ १२०० ते २०००

दादर ५० १४०० ते २२००

लाल हरभरा २०० ४८०० ते ४९००

जाड हरभरा १०० ८६०० ते ८७००

शेतकरी काय म्हणतात?

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे आता शेतीत वेळ देण्यासह पैसाही खर्च करावा लागणार आहे. घरात जे धान्य आहे, ते लवकर विक्री करावे लागणार आहे. मात्र, सध्या धान्याचे भाव कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागणार आहे.

- नामदेव चौधरी, शेतकरी.

घरात असलेला शेती माल विकायचा असला, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे दुकानांच्या वेळेवर मर्यादा आल्या आहेत. सकाळी ११ नंतर मालाची खरेदी होत नाही. त्यामुळे सकाळी जो भाव मिळेल, त्या भावात माल विकायचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

- स्वप्निल जाधव, शेतकरी.

व्यापारी काय म्हणतात?

सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यात आता दुकानांच्या वेळा कमी असल्याने, कमी वेळेत अधिकाधिक माल खरेदीचे प्रयत्न असतात. त्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना माल विकणे गरजेचे असले, तरी वेळेमुळे जास्त माल येत नाहीये.

- सुनील वाणी, व्यापारी.

मालाची आवक कमी झाल्यास त्यांचे भाव वाढतात, तर आवक वाढल्यास भाव कमी होतात. मात्र, सध्या धान्याची आवक कमी असली, तरी त्यांचे भाव कमीच होत आहे. दुकानांच्या वेळा कमी असल्याने माल जास्त खरेदी होत नाही.

- अशोक राठी, व्यापारी.